Kitne aadmi the… Sachin should teach dialogue style to Gabbarsing it doesn’t suit, Jitendra Awhad criticizes Sachin Pilgaonkar.


मराठी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि महागुरू या नावाने ओळखले जाणारे सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत ‘शोले’ चित्रपटातील “कितने आदमी थे…” हा प्रसिद्ध डायलॉग अमजद खान यांना बोलता येत नसल्याचे सांगितले होते.

Mumbai : मराठी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि महागुरू या नावाने ओळखले जाणारे सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत ‘शोले’ चित्रपटातील “कितने आदमी थे…” हा प्रसिद्ध डायलॉग अमजद खान यांना बोलता येत नसल्याचे सांगितले होते. ज्यावेळी अमजद खान हा डायलॉग बोलत होते, त्यावेळी तो पातळ आवाजात ऐकू येत होता. सचिन पिळगांवकर यांना त्याची जाणीव झाल्यानंतर ते अमजद खान यांना स्टुडिओत घेऊन गेले आणि त्यांच्या आवाजातच तो डायलॉग पुन्हा बोलून घेतल्याचे सांगीतले. यावर सोशल मिडीयावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत सचिन पिळगांवकर यांना डिवचलं आहे.(Jitendra Awhad: Kitne aadmi the… Sachin should teach dialogue style to Gabbarsing it doesn’t suit, Jitendra Awhad criticizes Sachin Pilgaonkar.)

“शोले हा सिनेमा १९७५ साली रिलीज झाला. त्यावेळी सिनेरसिकांनी शोले सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यातील एक – एक डायलॉग त्यावेळच्या पिढीच्या तोंडावर होता. डाकू, दरोडेखोर यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र, शोलेमध्ये अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग जेवढा गाजला, मला नाही वाटत तेवढा कोणता अभिनेता दरोडेखोराच्या भूमिकेमध्ये गाजला असेल. गब्बरसिंग अन् अमजद खान ही हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर नावे आहेत. पण, हे काही मनाला पटले नाही की, गब्बरसिंग म्हणजेच अमजद खान यांना डायलॉग फेकण्याचे कौशल्य- आदब हे त्या सिनेमातील बालकलाकार सचिन पिळगावकर याने शिकवली.

सचिनने स्टाईल शिकवावी, पचनी पडतच नाही

अमजद खान यांचे वडील झकारिया खान अर्थात जयंत हेदेखील १९५०-६० च्या दशकातील नामांकित अभिनेते होते. म्हणजेच चित्रपटसृष्टीत खानदान असलेल्या अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी, हे पचनी पडतच नाही. आज अमजद खान आपल्यात नाहीत आज ही जो कोणी शोले बघेल तो अमजद खान म्हणजेच गब्बर सिंग ला विसरूच शकत नाही.”

काय म्हणाले होते सचिन पिळगांवकर?

“शोले सिनेमा आल्यानंतर अनेकांना असं वाटलं की, अमजदचा आवाज हा गब्बर सिंहचा आवाज वाटत नाहीय. तो थोडासा पातळ वाटतोय. त्याला मी माईकसमोर उभं केलं आणि आमचे सूद नावाचे तेव्हा रेकॉर्डिस्ट होते, असिस्टंट होते ते मंगेश देसाईंचे. त्यांना सांगितलं ट्रेबल एकदम बंद करदो और बेस बढादो. मी अमजदला सांगितलं माईकच्या जवळ उभा राहा, आणि वरच्या पट्टीत नको बोलूस खालच्या पट्टीत बोल. कारण माझ्यामागे तो अनुभव होता, जो अमजदच्या मागे नव्हता आणि पहिला डायलॉग “कितने आदमी थे…” आधी त्यानं वरच्या पट्टीत ओरडून म्हटलेलं. मी त्याला सांगितलं नाही, असं नाही. नीचे के सूर मे बोल. पट्टी पुरी नीचे कर. Because I Am A Singer Also. मला ऑक्टिम्स कळतात. त्यामुळे खालच्या सुरात बोल, कितने आदमी थे…”, असं सचिन पिळगांवकर एका मुलाखतीत म्हणाले होते.


हेही वाचा…Jitendra Awhad : संभाजी भिडेंच्या वक्तव्याने जितेंद्र आव्हाड भडकले; म्हणाले, मनोहर भिडे जागे झाले…





Source link

Comments are closed.