एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 35 दिवस ही निव्वळ अफवाच, केंद्र सरकारनं नेमकं काय सांगितलं?

नवी दिल्ली : LPG सिलेंडर बुकिंग संदर्भात एक दावा केला जात होता. तो दावा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. काही बातम्या आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगण्यात आलं होतं की गॅस बुक करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना वेगळा कालावधी असेल. मात्र, सरकारनं असा कोणताही नियम लागू केला नाही, असं सांगितलं आहे.  प्रधानमंत्री उज्ज्वला योजना योजनेच्या ग्राहकांना 45 दिवस वाट पाहावी लागेल आणि इतरांसाठी बुकिंगसाठी 25 ते 35 दिवसांचा कालावधी असेल, अशा प्रकारचे दावे करण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकारनं या अफवा असल्याचं सांगितलं आहे.

नेमका नियम काय?

सरकारच्या नियमानुसार सध्या जुनेच नियम लागू आहेत. शहरी भागातील ग्राहकांसाठी बुकिंगसाठी  25 दिवस निश्चित करण्यात आला आहे. तर, ग्रामीण भागात 45 दिवस निश्चित करण्यात आले होते. हे नियम सर्वांसाठी लागू आहेत. यात  कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.

सरकारनं काय म्हटलं  ?

लोकांनी अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सरकारनं केलं आहे. सरकारनं देशात गॅसची कमतरता नसल्याचं सांगितलं आहे, एलपीजीचा साठा पुरेसा आहे. त्यामुळं घाबरुन किंवा गडबडीत बुकिंग करु नये असं, सरकारनं म्हटलं.

बुकिंग लवकर केल्यास काय?

जर एखाद्या ग्राहकांनी निश्चित वेळेपूर्वी गॅस बुकिंग करण्याचा प्रयत्न केला तर सिस्टीमकडून बुकिंग ब्लॉक केलं जाईल. वेळ मागील गॅस डिलिव्हरीच्या तारखेपासून मोजली जाईल. हा नियम शहरं आणि गावांसाठी लागू असेल.

सरकारनं गॅस बुकिंग नियमासंदर्भात विविध अफवा समोर आल्यानंतर अधिकृत नियम जारी केला आहे. अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सुरु असल्यानं होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे. यामुलं एलपीजी गॅसचा पुरवठा जागतिक पातळीवर प्रभावित  झाला आहे.यामुळं देशभरात सरकारनं विविध पावलं उचलली आहेत. सरकारकडून गॅस पुरवठा सर्वांना व्हावा यासाठी 14 किलोच्या सिलेंडरमध्ये 8 ते 10 किलो गॅस भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.