राज्यातील नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उमेदवारी न मिळालेल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरी केलीये. तर अनेक अपक्ष सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढवणार आहेत, असं असताना बंडखोर आणि आणि अपक्ष उमेदवारांवर काही नगरपालिका आणि नगर पंचायतींचं समिकरण ठरणार आहे. किती ठिकाणी मविआ आणि किती ठिकाणी महायुती याचं चित्रही आज स्पष्ट होणार आहे. तसंच किती नगर पंचायती या बिनविरोध होणार हेदेखील आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार, तर कुणाचं मन वळवण्यात नेत्यांना यश येणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…

Comments are closed.