Maharashtra Rain likely at many places, but Meteorological Department issues alert


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, नाशिक, सातारा या घाटमाथ्यांच्या भागात आज काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस, तर 21 जूनला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. ठाणे, नाशिक, पुणे या जिल्ह्यांना तर पावसाने झोडपून काढले. पण शुक्रवारी (ता. 20 जून) राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. पण असे असले तरी हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी, तर एखाद्या भागात तीव्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. (Maharashtra Rain likely at many places, but Meteorological Department issues alert)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, नाशिक, सातारा या घाटमाथ्यांच्या भागात आज काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस, तर 21 जूनला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा आणि रस्ते बंद होण्याचा संभाव्य धोका असल्याने स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक शहर, अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूर या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 21 जूनला पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा… Mumbai Local : मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात हाणामारी, व्हिडीओ व्हायरल; नेमके काय घडले?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 21 जूनपासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तरीही, कोकण आणि घाटमाथ्याच्या भागात सतर्कतेचा इशारा कायम आहे. नागरिकांना पूर, दरड कोसळणे आणि रस्ते बंद होण्याच्या शक्यतेमुळे सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जोरदार पावसामुळे कोकण आणि घाटमाथ्याच्या भागात पूरस्थिती आणि दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले आणि समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे तसेच प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पुढील दोन दिवस हवामानाची परिस्थिती तीव्र राहण्याची शक्यता असल्याने सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.



Source link

Comments are closed.