All India Superstition Eradication Committee expressed displeasure over the Aghori worship method of superstition
भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजा केल्याचा आरोप विरोधकांकडून झाल्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
मुंबई : पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी काही व्हिडीओ आणि फोटो शेअर भरत गोगावले यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा दावा केला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. याप्रकरणी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच आता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. (All India Superstition Eradication Committee expressed displeasure over the Aghori worship method of superstition)
अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे महासचिव हरीश देशमुख यांनी म्हटले की, राजकीय मराठी समाजाचा आरसा असतात आणि पुढाऱ्यांकडून समाजासाठी विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगणे अपेक्षित असते. मात्र भरत गोगावले यांचे उदाहरण असो, देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा निवासस्थानी गृहप्रवेशाचा विषय असो किंवा सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या सर्व मंत्री आणि आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला घेऊन जात नवस फेडण्याचा विषय असो, ही सर्व उदाहरणे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी आहेत. तसेच आपल्या संविधानात तरतूद असलेल्या विज्ञानवादी दृष्टिकोनाच्या पुरस्काराच्या कलमाच्या विरोधातील आहेत, असे म्हणत देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा – Baramati : ठाकरेंनी पवारांचा उल्लेख ब्रॅंड म्हणून केला, पण सुप्रिया सुळे म्हणाल्या…
अधिकाऱ्यांनी दोषींवर गुन्हे दाखल करावे
हरीश देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आपल्या राज्यात अधिनियम 2013 या कायद्याची अंबलबजावणी करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत अशा घटनांची चौकशी व्हायला हवी. तसेच या संदर्भात कोणी पुराव्यासह तक्रार दाखल करत असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांनी दोषींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी हरीश देशमुख यांनी केली आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : हे तर ठाण्याचे अब्दुल्ला, युतीच्या चर्चांवरून राऊतांची शिंदेंवर बोचरी टीका
Comments are closed.