Bharat Gogawale claims that Aditya Thackeray got a ministerial berth because of Rashmi Thackeray
शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करण्यामागचे कारण सांगताना खळबळजनक दावा केला आहे.
मुंबई : 20 जून 2022 रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातच्या सुरतमधील ली मेरिडियन हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन केलं. त्या वेळचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं होतं. दरम्यान आता, शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करण्यामागचे कारण सांगताना खळबळजनक दावा केला आहे. (Bharat Gogawale claims that Aditya Thackeray got a ministerial berth because of Rashmi Thackeray)
माध्यमांशी संवाद साधताना भरत गोगावले म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांना कधी भेटायला गेलो की, ते आमच्या पाठीवर थाप मारायचे, काय-कसं चाललंय अशी आमची विचारपूस करायचे. एकदा मी माझ्या वाढदिवशी त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. तेव्हा आम्ही सर्व पदाधिकारी खाली बसलो होतो. परंतु बाळासाहेबांनी मला सांगितलं की, खाली बसायचं नाही, इथे माझ्या बाजूला बसायचं. खुर्ची देणाराही मी आहे आणि घेणाराही मीच आहे. ही आपुलकी आम्ही त्यावेळी अनुभवली होती. म्हणून आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक होतो. परंतु याआधीही आम्ही सांगितलं की, महिलांनी राजकारणात किती हस्तक्षेप करावा याला काही मर्यादा असतात. म्हणून मी काल बोलून गेलो की, त्यावेळी जर एकनाथ शिंदे यांना आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद दिलं असतं, तर फार वेगळं चित्र असतं. परंतु, ठीक आहे. काही कारणं आम्ही समजू शकतो. पण आदित्य ठाकरे यांना जे मंत्रीपद देण्यातं आलं, ते कुठल्याच शिवसैनिकाला पटलं नाही, असं गोगावले म्हणाले.
हेही वाचा – Sanjay Raut : महाराष्ट्रात ठाकरे हाच ब्रँड, फडणवीस स्वतःला मदारी समजतात; काय म्हणाले राऊत?
भरत गोगावले म्हणाले की, आम्ही अनेकांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं की, तुम्ही श्रीकांत शिंदे यांना मंत्रीपद द्या. पण त्यांनी आमचा प्रस्ताव स्वीकारला नाही. एकनाथ शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांना मंत्रीपद दिलं. ते त्यांच्या मुलाला खुशाल मंत्रीपद देऊ शकत होते. पण तरीही त्यांना ते पटलं नाही. याला मोठेपणा म्हणतात. परंतु आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदामागे वहिनी (रश्मी ठाकरे) आणि वहिनींचे नातेवाईक असा सगळा लवाजमा होता. त्यामुळे इच्छा असूनही उद्धव ठाकरे काही करू शकत नव्हते. स्त्री हट्टापुढे उद्धव ठाकरे काय करणार? हे सर्व जेव्हा आमच्या दृष्टीकोनात आलं, तेव्हा आम्ही सर्व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव करून बाहेर पडलो, असे भरत गोगावले म्हणाले.
हेही वाचा – Maharashtra Rain : मुंबईत पावसाची रिमझिम, कोकणाला रेड अलर्ट; राज्यासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे
Comments are closed.