Bharat Gogawale gave a strong reply after Anand Paranjape accused him of extorting money from the scam


‘इडियट्स’ ची गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळे सात दिवसात बाहेर काढण्याचा इशारा देत आनंद परांजपे यांनी थेट भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे. यानंतर आता भरत गोगावले यांनी आनंद परांजपे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. 

पनवेल : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार आले, मात्र त्यानंतर अद्यापही रायगड जिल्ह्याला पालकमंत्री लाभलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट हे दोन्ही पक्ष रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच रायगड जिल्हा पालकमंत्री पदासाठी हपापलेले शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता गेलेली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच रायगडमधील ‘थ्री इडियट्स’ मधल्या एका ‘इडियट्स’ ने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकली असून त्या ‘इडियट्स’ ची गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळे सात दिवसात बाहेर काढण्याचा इशारा देत आनंद परांजपे यांनी थेट भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे. यानंतर आता भरत गोगावले यांनी आनंद परांजपे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. (Bharat Gogawale gave a strong reply after Anand Paranjape accused him of extorting money from the scam)

माध्यमांशी संवाद साधताना आनंद परांजपे म्हणाले की, खासदार सुनील तटकरे यांच्या भाच्याच्या बायकोचा विमान अपघातात मृत्यू झाला असून त्यांचे कुटुंब अद्याप त्या दुःखातून सावरलेले नाही. मात्र दुसरीकडे भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून बेछूट आरोप केले आहेत. भरत गोगावले यांनी बोलताना सिंचन घोटाळ्याचा विषय काढला आहे. परंतु सिंचन घोटाळ्याची फाइल कुठे अडकली असेल तर ती त्यांनी (भरत गोगावले) बाहेर काढावी. परंतु भरत गोगावले यांची गुन्हेगार प्रवृत्ती आहे. त्यांनी रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे आणि सार्वजनिक बांधकाम सभापती असताना जिल्हा परिषदमध्ये केलेले घोटाळे आम्ही पुढील सात दिवसामध्ये बाहेर काढू, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला.

हेही वाचा – Bharat Gogawale : स्त्री हट्टापुढे ठाकरे काय करणार? आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावर काय म्हणाले गोगावले?

आनंद परांजपे म्हणाले की, खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम रायगडमधील ‘थ्री इडियट’कडून राहिलेला आहे. विधानसभेत सुनील तटकरे यांनी युती धर्माचे पालन केले आहे. जर त्यांनी युती धर्माचे पालन केले नसते तर भरत गोगावलेंसह अजून दोन उमेदवार पडले असते. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर होती. त्यावेळी मतदारसंघात केलेल्या आपल्या कामाच्या जोरावर सुनील तटकरे हे निवडून आले आहेत. मात्र हे ‘थ्री इडीयट्स’ बेछूट आरोप करत आहे, असेही आनंद परांजपे म्हणाले.

भरत गोगावलेंचे जोरदार प्रत्युत्तर

आनंद परांजपे यांच्या टीकेसंदर्भात भरत गोगावले यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भरत गोगावले म्हणाले की, आता प्रत्येकजण आपापल्या परीने सांगतोय. पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यावरून ज्यांना (आनंद परांपजे) जे काही टोचतंय, त्यांनी माझे 100 टक्के घोटाळे बाहेर काढावेत. जर घोटाळे बाहेर काढले तर मी मंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देईल. भरत गोगावले याने स्वतः काय केलंय हे त्यांनी सांगावं. मग मी मंत्रिपदाचा आमदारकीसहित राजनामा देईन. परंतु जर मी घोटाळा केला नसेल तर आनंद परांजपे हे त्यांच्या तोंडाला काळ फासून घेणार का? असा प्रश्न देखील भरत गोगावले यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांचं भांडण किती दिवस चालतंय हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Politics : काही लोकांनी रुमाल वेटरसारखा खांद्यावर टाकला; भरत गोगावलेंनी तटकरेंची उडवली खिल्ली



Source link

Comments are closed.