Cm devendra fadnavis pays tribute to padmashri awardee maruti chitampalli in marathi
मुख्यमंत्री म्हणतात, निसर्गाला ज्यांनी शब्दरुपाने सजवले, त्यातून विपूल साहित्यसंपदा निर्माण करुन जनसामान्यांना निसर्गाचे ज्ञान दिले, असे अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारे आहे.
Devendra Fadnavis : मुंबई : सोलापूरचे सुपूत्र, सुप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ, अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने ते आजारीच होते. हा पुरस्कार घेऊन दिल्लीहून परतल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर, बुधवार, 18 जून रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठीतील थोर साहित्यिक आणि पक्षीतज्ज्ञ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मारुती चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. (cm devendra fadnavis pays tribute to padmashri awardee maruti chitampalli)
चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. मुख्यमंत्री म्हणतात, निसर्गाला ज्यांनी शब्दरुपाने सजवले, त्यातून विपूल साहित्यसंपदा निर्माण करुन जनसामान्यांना निसर्गाचे ज्ञान दिले, असे अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारे आहे.
हेही वाचा – Maruti Chitampalli Passes Away : पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन, 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वनविभागात काम करताना आपल्या कामाशी किती एकरुप व्हावे, याचे आदर्श उदाहरण म्हणजे चितमपल्ली सर. ते व्रतस्थ भूमिका जगले. 13 भाषा जाणणार्या चितमपल्ली सरांनी निसर्गाच्या अनेक किमया त्यांनी शब्दांतून मांडल्या. आदिवासींकडे असलेले ज्ञान त्यांनी शब्दबद्ध केले. पक्ष्यांची भाषा जगाला सांगितली. त्यांनी तयार केलेले वनोपनिषद, पक्षीकोष हे ज्ञानधन त्यांनी कायमस्वरुपी आपल्याला उपलब्ध करून दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. साहित्यसेवा करताना अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या या समग्र कार्याचा गौरव म्हणून याचवर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची खंतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
निसर्गाला ज्यांनी शब्दरुपाने सजवले, त्यातून विपूल साहित्यसंपदा निर्माण करुन जनसामान्यांना निसर्गाचे ज्ञान दिले, असे अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारे आहे.
वनविभागात काम करताना आपल्या कामाशी किती एकरुप व्हावे, याचे… pic.twitter.com/PIekZC53iC— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 18, 2025
महाराष्ट्रातील अरण्यऋषी अशी ख्याती असलेले चितमपल्ली यांनी माजी वनाधिकारी म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. वनाधिकारी म्हणून सरकारी नोकरी करतच त्यांनी वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांना स्वत:ला वाहून घेतलं होतं. मारुती चितमपल्ली यांनी राज्य सरकारच्या वनविभागात 30 वर्ष नोकरी केली. या काळात ते मेळघात व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक देखील होते. या प्रकल्पासह कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य यांच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
Comments are closed.