Devendra Fadnavis’ reaction on talks of Raj Thackeray and Uddhav Thackeray coming together
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (06 जून) म्हटले की, जे महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या मनात आहे, तेच होईल, असे म्हणत युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गडचिरोली : राज ठाकरे यांनी युतीसाठी दिलेल्या टाळीला शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिटाळी दिली आहे. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांसोबतच जनसामान्यांकडून करण्यात येत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (06 जून) म्हटले की, जे महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या मनात आहे, तेच होईल, असे म्हणत युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis’ reaction on talks of Raj Thackeray and Uddhav Thackeray coming together)
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आह? माझा काय संबंध येतो त्यामध्ये? ते आपआपसात ठरवतील. यांनी साथ द्यायची, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की, त्यांनी द्यायचा नाही आहे. तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे. ही सर्वात मोठी समस्या आहे, पण काही हरकत नाही. माध्यमांचं ते कामच आहे. पण आता तरी त्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काही आहे, असं मला वाटत नाही, असं स्पष्ट केल्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले की, तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसत? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी योग्य वेळी सांगतो. तुम्हाला माहिती आहे, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो. तो उचित वेळी मी सांगत असतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Ajit Pawar : लाडक्या बहिणींचा निधी पुन्हा वळवला; अजितदादा म्हणतात, जर कोणाची तक्रार करायची असेल तर…
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात प्रश्न विचारला असता आज उद्धव ठाकरे म्हणाले की, “जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल.” कारण एकत्र येण्याबाबत जे काही बाकीचे बारकावे आहे, ते आम्ही पाहात आहोत. त्यामुळे संदेश कशाला, मी तुम्हाला बातमीच देईन. कारण माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे कोणते नेते आमच्या एकमेकांच्या संपर्कात आहेत, त्यांच्याही मनात संभ्रम नाही. त्यामुळे आम्ही कोणताही संदेश देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती आम्ही देऊ, असे उद्धव ठाकरेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येतील, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
हेही वाचा – मराठी : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नाला बगल, त्याऐवजी एकनाथ शिंदे म्हणाले…
Comments are closed.