Kolhapur 40 years old woman tied in chain released by police
कोल्हापूर : पुण्यातील हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यात जोरदार चर्चेत आहेत. अशामध्ये राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहे. अशामध्ये कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 40 वर्षीय महिलेला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर घटना ही जिल्ह्यातील राजारामपुरी येथील असून घटनेची माहिती मिळताच क्राइम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्या महिलेची त्वरित सुटका केली. पोलिसांनी तपास केला असता यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Kolhapur 40 years old woman tied in chain released by police)
हेही वाचा : Manikrao Kokate : नुकसानीची पाहणी केल्यावर माणिकराव आधी बरळले; आता म्हणतात, शब्द चुकला असेल पण…
पोलिसांनी तपास केल्यानंतर साखळदंडाने बांधलेल्या या महिलेचे नाव सारिका साळी असल्याचे समोर आले. त्यांचे वय 40 वर्षे एवढे आहे. संबंधित महिला ही गतिमंद असून रस्त्यावर फिरताना काहीही उचलून घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिच्या घरच्या मंडळींनी तिला दोन महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवले असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकला असता संपूर्ण घटना उघडकीस आली. दरम्यान संबधित महिला तिच्या भावाच्या घरी राहते. यात तिचा भाऊ आणि भावाची बायको तसेच भाचा हे सर्व एकत्र राहतात. गेल्या दोन महिन्यांपासून या महिलेला साखळदंडात बांधून ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असून त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ह्याला काय म्हणावं…… काय बोलावं ??
कोल्हापूर राजारामपुरी येथे ४० वर्षाच्या बाईला चेन ने बांधून कुलूप लावून ठेवले?
आता शब्दच उरेल नाहीत pic.twitter.com/7rmW6rOKk5
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 30, 2025
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी संबंधित महिलेला साखळदंडात बांधणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणी केली. तसेच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील याबाबत टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, “याला काय म्हणावे? कोल्हापूर राजारामपुरी येथे 40 वर्षाच्या बाईला चेनने बांधून कुलूप लावून ठेवले? आता शब्दच उरले नाहीत.” असे म्हणत त्यांनी आक्रोश व्यक्त केला.
Comments are closed.