Maharashtra rain that went away on holiday has returned, know what the weather will be like in the next 24 hours?
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार, पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील, कोकण-गोवा आणि मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने उसंत घेतली आहे. पण अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असते. मुंबईत अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे उकाडा वाढला आहे. ज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पण आता हळूहळू पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील, कोकण-गोवा आणि मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. या दरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील सरींचीसुद्ध हजेरी असेल. (Maharashtra rain that went away on holiday has returned, know what the weather will be like in the next 24 hours?)
काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल पाहायला मिळत आहे. ऊन-सावलीच्या खेळामध्ये मधेच पाऊस हजेरी लावत असल्याने उकाडा वाढू लागला आहे. पण आता हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, घाटमाथ्यावरील भागामध्ये आज शनिवारी (ता. 7 जून) मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शनिवारी घाटमाथ्यावर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, पुणे, सातारा, सांगली या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय सोलापूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा… Operation Sindoor : प्रखर ‘बुद्धी’च्या प्रकाशासमोर निस्तेज ‘ज्योती’
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार, पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील, कोकण-गोवा आणि मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यादरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील सरींचीसुद्ध हजेरी असेल. गेल्या काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे एकाच जागेवर स्थिरावल्यामुळे मोसमी पावसाचा जोर कमी झाला. मात्र त्यामुळे अधूनमधून काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरीसुद्धा बरसल्या. राज्यात एकिकडे पावसाची चिन्हे असली तरीही दुसरीकडे मात्र उकाडा वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळं राज्यातील तापमानाच विभिन्नता दिसून येत आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यात ब्रम्हपुरी इथे सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Comments are closed.