Nitesh Rane’s statement regarding the Chief Minister’s post, naming Devendra Fadnavis, is under discussion
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. तर अजित पवार हे अधूनमधून मुख्यमंत्री होण्याबाबत वक्तव्य करत असतात. अशातच आता भाजपा आमदार आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केले आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने 132 जागा जिंकल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. तर अजित पवार हे अधूनमधून मुख्यमंत्री होण्याबाबत वक्तव्य करत असतात. अशातच आता भाजपा आमदार आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केले आहे. (Nitesh Rane’s statement regarding the Chief Minister’s post, naming Devendra Fadnavis, is under discussion)
नितेश राणे आज (22 जून) वर्सोवा येथील कोळी बांधवांसोबत मार्केटला भेट दिली. यावेळी त्यांनी वर्सोवा खाडीजवळील स्थानिक मच्छीमारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करताना म्हटले की, मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. आपण माझी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका, कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम आहेत. पुढील 100 वर्षे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहावेत अशी प्रार्थना करा, असा सल्ला नितेश राणे यांनी कोळी बांधवांना दिला.
हेही वाचा – Politics : शरद पवार गटाच्या नेत्याने दिली ‘घड्याळा’ची जाहिरात, शिंदे-अजिदादांचा फोटो वापरला; काय आहे प्रकरण?
नितेश राणे म्हणाले की, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळावा, ही मागणी वर्षानुवर्ष होत होती. मात्र राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर पहिल्या 100 दिवसात मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला. त्यामुळए मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. तसेच आपण आधी सरकार म्हणून मदत मागायला जायचो, तेव्हा अधिकारी हात आकडते घ्यायचे आणि तुटपुंजी मदत द्यायचे. पण डहाणूमध्ये 1 कोटी 89 लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यावेळी मी मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे गेलो आणि नुकसान जास्तीत जास्त भरून देण्याची मागणी केली. कारण जर आधीच्या अनुषंगाने मदत केली असती तर मच्छिमारांचा अपमान झाला असता. त्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आणि त्यांनी 100 टक्के नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले, अशी माहिती नितेश राणे यांनी कोळी बांधवांना दिली.
हेही वाचा – Jitendra Awhad : “कितने आदमी थे…” सचिनने स्टाईल शिकवावी, पचनी पडत नाही, आव्हाडांची सचिन पिळगांवकरांवर टीका
Comments are closed.