Prime Minister, Union Home Minister call Chief Minister Devendra Fadnavis to inquire about Indrayani bridge accident in marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या दुर्घटनेची माहिती घेतली आहे. तसेच या मदतकार्यात राज्य सरकारला लागेल ती मदत देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Bridge Collapse : मुंबई : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवर असलेल्या पुलावर अनेक पर्यटक उभे असताना हा पूल तुटला आणि यामध्ये 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या दुर्घटनेची माहिती घेतली आहे. तसेच या मदतकार्यात राज्य सरकारला लागेल ती मदत देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (Prime Minister, Union Home Minister call Chief Minister Devendra Fadnavis to inquire about Indrayani bridge accident)
कुंडमळा हे इंद्रायणी नदीवरील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी दर रविवारी तसेच सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. कुंडमळा ओलांडण्यासाठी इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. हा पूल कमकुवत झाल्याची तक्रारही येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आणि या पुलावर पर्यटकांची गर्दी वाढल्याने हा पूल रविवार (ता. 15 जून) दुपारी 3.45 वाजताच्या सुमारास कोसळला. आणि यावेळी पुलावर असलेले 20 ते 25 जण पाण्यात बुडाले. दोन ते तीन दिवसांपासून मावळ तालुक्यात आणि इंद्रायणी नदीपात्र परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीतील पाण्यात वाढ झाली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मृतांच्या वारसाला शासकीय मदत जाहीर झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सायप्रस येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून पुणे जिल्ह्यातील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती घेतली आणि या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या मदतकार्यात राज्य सरकारला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 15, 2025
हेही वाचा – Sharad Pawar : सर्व पर्जन्य पर्यटन स्थळांबाबत…इंद्रायणी पूल दुर्घटनेवरून काय म्हणाले शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या घटनेची माहिती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. घटनेची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. आणि केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
Deeply saddened by the tragic incident of the bridge collapse on the Indrayani River in Talegaon, Pune. Spoke with Maharashtra Chief Minister Shri Devendra Fadnavis and inquired about the present situation on the ground. NDRF teams posted nearby quickly rushed to the site, joined…
— Amit Shah (@AmitShah) June 15, 2025
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. त्यानंतर शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पुण्यातील तळेगाव येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेने खूप दुःख झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आणि सध्याच्या परिस्थितीची विचारपूस केली. जवळच तैनात असलेल्या एनडीआरएफ पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, आणि तत्परतेने अनेकांचे जीव वाचवले. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांप्रति मनापासून संवेदना. जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी अमित शहांनी प्रार्थना केली आहे.
Comments are closed.