Sanjay Raut allegations against Devendra Fadnavis on the Vadhavan port issue
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी वाढवण बंदराच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर आरोप केला आहे. एका अडानीसाठी फडणवीस मराठी लोकांवर जुलूम करत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
पालघर : वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांचा संघर्ष पुन्हा पेट घेत असून या प्रकल्पाविरोधात बुधवारी (ता. 25 जून) स्थानिक नागरीक आक्रमक झाले आहेत. जेएनपीए (JNPA) कडून वाढवण समुद्र किनारी सुरू करण्यात आलेला ड्रोन सर्व्हे ग्रामस्थांच्या तीव्र आणि एकसंघ विरोधामुळे थांबवावा लागला. कोणतीही पूर्वसूचना न देता खासगी कंपनीकडून चोरीछुपे सुरू झालेल्या या सर्व्हेच्या विरोधात ग्रामस्थांनी जोरदार निषेध करत हे लोकशाही व्यवस्थेचे सरळसरळ उल्लंघन असल्याचा आरोप केला. पण त्यांच्या या विरोधाला आता राज्य सरकारने न जुमानन्याचे ठरवले असल्याचेच पाहायला मिळत आहे. कारण या आंदोलन करणाऱ्यांविरोधात पोलिसांची मोठी फौज वाढवण बंदराच्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. (Sanjay Raut allegations against Devendra Fadnavis on the Vadhavan port issue)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी वाढवण बंदराच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर आरोप केला आहे. एका अडानीसाठी फडणवीस मराठी लोकांवर जुलूम करत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. त्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली असून या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हा आरोप केला आहे. राऊतांनी आपल्या पोस्टमधून एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. “आज दुसऱ्या दिवशीही पोलीस बळाचा वापर करून वाढवण बंदराचे सर्वेक्षण सुरू आहे, गावकरी त्यांच्या जमिनी द्यायला तयार नाहीत, मरण पत्करू पण जमिनी देणार नाही हा त्यांचा आक्रोश आहे.” असे राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आज दुसऱ्या दिवशीही पोलीस बळाचा वापर करून वाढवण बंदराचे सर्वेक्षण सुरू आहे, गावकरी त्यांच्या जमिनी द्यायला तयार नाहीत,मरण पत्करू पण जमिनी देणार नाही हा त्यांचा आक्रोश आहे
एका अडानी साठी मराठी लोकांवर हा जुलूम फडणवीस करत आहेत
आणि हे भंपक लोक आणीबाणी विरुद्ध आंदोलन करतात! pic.twitter.com/LhdhFE8ddl— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2025
हेही वाचा… Sanjay Raut on Ajit Pawar : माळेगाव विजय 500 कोटीच्या अमिषामुळेच, संजय राऊतांची टीका
तसेच, “एका अडानीसाठी मराठी लोकांवर हा जुलूम फडणवीस करत आहेत आणि हे भंपक लोक आणीबाणी विरुद्ध आंदोलन करतात!” असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून लगावला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, राऊतांनी त्यांच्या या पोस्टमध्ये एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सर्वेक्षण करून परतणाऱ्या पोलिसांना वाढवण बंदराविरोधात आंदोलन करणारे आंदोलक विरोध करताना दिसत आहेत. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झालेली पाहायला मिळत आहे. त्याचमुळे फडणवीस सरकार मराठी लोकांवर अन्याय करत असल्याचा आरोप राऊतांकडून करण्यात आला आहे.
Comments are closed.