Shiv Sainiks in Marathwada also want Raj and Uddhav Thackeray to come together if the Thackeray brothers come together they will end the Mahayuti
छत्रपती संभाजीनगर – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही दोन्ही भाऊ एकत्र येण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी आता नातेवाईक सुद्धा प्रयत्न करत आहेत. याबाबत अनिल परब यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. दोन्ही भाऊ एकत्र आले तर भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीला उलथवून टाकतील, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे, ते माध्यमांसोबत बोलत होते.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, मराठवाड्यातील पदाधिकारी म्हणतात, दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे. दोन्ही भाऊ महायुतीला धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गजानन किर्तीकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आनंदी नाहीत, असेही ते म्हणाले. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठीची जबाबदारी ही शिवसेनेचे (ठाकरे) अनिल परब यांच्यावर देण्यात आली आहे. तर नातेवाईक देखील आता सक्रीय झाले आहेत. ठाकरे बंधूंचे चंदू मामा हे यासाठी प्रयत्न करत असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
राणे पुत्रांना जेलमध्ये टाकणार
नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही मुलं यांनी भाजप संपवण्याचा घाट घातलेला आहे. त्यांना शिस्त नाही. त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायला नको, ते घाणेरड बोलत आहे. एक पोरगा शिवसेनेचा आमदार आहे तर दुसरा भाजपचा. त्यांच्यात कोणतीच शिस्त नाही. ते आदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकण्याची भाषा करतात, थोडं थांबा तुम्हालाच आम्ही जेलमध्ये टाकणार आहे. यांचे खूप प्रकरण आहे, हेच जेलमध्ये जाणार आहे, असा इशारा चंद्रकांत खैरेंनी राणे पुत्रांना दिला.
कीर्तिकरांना तिकडे जाऊन पश्चताप होत आहे
गजानन कीर्तिकर हे अनुभवी नेते आहेत. ते आता चुकून शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यांचा मुलगा अजूनही आमच्यासोबत आहे. शिवसेना फुटली याचे त्यांनाही दुःख झालेले आहे. त्यांच्या पुस्तकातही त्यांनी ते लिहिले आहे.
उद्धव, आदित्य ठाकरे यांना शिंदेंची शिवसेना आणि भाजप त्रास देतात, त्यामुळे त्यांच्यासोबत आता आम्हाला जायचे नाही, मात्र आम्हाला एकनिष्ठ शिवसैनिक पाहिजे. गजानन कीर्तीकर बोलले असतील की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे, कारण त्यांचा मुलगा आमच्याकडे आहे. त्यांना तिकडे जाऊन पश्चात्ताप होत आहे, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.
हेही वाचा : NCP : आषाढी एकादशीपर्यंत दादा – ताई एकत्र येणार म्हणणाऱ्या मिटकरींना प्रांताध्यक्षांच्या कानपिचक्या
Comments are closed.