MNS woman leader Shalini Thackeray slams Thackeray group over alliance issue
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न हे ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. पण मनसे नेत्यांकडून मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांना 2014 आणि 2022 ची आठवण करून देण्यात येत आहे.
मुंबई : राज्याच्या राजकारणात आता दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत जनमाणसातून व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न हे ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. पण मनसे नेत्यांकडून मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांना 2014 आणि 2022 ची आठवण करून देण्यात येत आहे. त्यामुळे मनसे – ठाकरे गट युतीत मनसे नेतेमंडळींकडूनच मिठाचा खडा टाकण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण आता या युतीच्या मुद्द्यावरून मनसे महिला नेत्या शालिनी ठाकरे यांनी सुद्धा ठाकरे गटाला झापले आहे. मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियावर युतीसंदर्भात एक पोस्ट केली आहे. त्यामुळे एका नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics: MNS woman leader Shalini Thackeray slams Thackeray group over alliance issue)
मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “बाळासाहेबांबद्दल अपमानास्पद बोलणारे आता मराठी माणसाच्या युतीबद्दल बोलतायत. या नव शिवसैनिकांनी आधी याची माहिती घ्यावी की, 2014 आणि 2022 साली मराठी माणूस एकत्र होऊ नये यासाठी कोणी मिठाचा खडा टाकला होता? उत्तर मिळाले की महाराष्ट्राला कळवा…” असे शालिनी ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनसे नेत्यांकडून ठाकरे गटाला जुनी आठवण करून देण्यात येत आहे. कारण 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी एकत्र लढावे, असा प्रस्ताव मनसेकडूनच ठेवण्यात आला होता. पण त्यास शिवसेना (आताचा ठाकरे गट) पक्षाने विरोध करत स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे आता मनसे नेत्यांकडून याबाबतची आठवण ठाकरे गटाला करून देण्यात येत आहे.
बाळासाहेबांबद्दल अपमानास्पद बोलणारे आता मराठी माणसाच्या युतीबद्दल बोलतायत… या नव शिवसैनिकांनी आधी याची माहिती घ्यावी की
२०१४ आणि २०२२ साली मराठी माणूस एकत्र होऊ नये यासाठी कोणी मिठाचा खडा टाकला होता?उत्तर मिळाले की महाराष्ट्राला कळवा…
— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 24, 2025
मनसे-ठाकरे गट युतीची चर्चा का?
“महाराष्ट्र हितासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी जुने वाद विसरून जाईन”, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. तर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज यांना प्रतिसाद दिला आहे. पाठोपाठ मनसे व शिवसेनेचे (ठाकरे) कार्यकर्ते आणि स्थानिक नेते एकमेकांशी संवाद साधताना दिसू लागले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा जोर धरू लागली आहे. असे असताना या दोन्ही भावांमधील बहुचर्चित युती अद्यापही अनिश्चित आहे. राज आणि उद्धव ठाकरे दोघेही युतीच्या शक्यतांबाबत वक्तव्ये करत असले तरी दोघांनीही अद्याप युतीसंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर आता एकीकडे ठाकरे गट या युतीसाठी सकारात्मक असताना दुसरीकडे मात्र मनसे नेत्यांकडून याला विरोध दर्शविण्यात येत आहे.
हेही वाचा… Sanjay Raut : मराठी भाषेबद्दल साहित्यिकांशी चर्चा, संजय राऊतांनी केला हा सवाल
Comments are closed.