मुंबईत विमान कोसळले तर काय होईल; हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

अहमदाबादसारखी घटना मुंबईत घडली तर काय होईल, अशी चिंता उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केली. मुंबई विमानतळाशेजारी खूप झोपडय़ा आहेत. अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानात सव्वा लाख लिटर पेट्रोल होते. एका लेखात हा तपशील देण्यात आला आहे. या लेखाची प्रत महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांना द्यावी. जेणेकरून या घटनेची तीव्रता लक्षात घेऊन काय करता येईल हे तपासावे, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने नमूद केले. एसआरए कायद्याचा पुनर्विचार करून त्यात काही बदल करता येईल का याचा विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. त्यानुसार यावर सुनावणी घेण्यासाठी हे खंडपीठ स्थापन करण्यात आले. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने ही चिंता व्यक्त केली.
Comments are closed.