विरोधीपक्ष संपवण्यासाठी ज्या विषाचा भाजपने उपयोग केला, तेच त्यांना बाधतंय! उद्धव ठाकरेंनी सुनावलं

विरोधीपक्ष संपवण्यासाठी ज्या विषाचा भाजपने उपयोग केला, तेच त्यांना बाधतंय, असा हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. विधान भवन आवारात उद्धव ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली आहे.
‘महिला पोलिसावर हात उचलणाऱ्यांचे हात छाटा’
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी आरएसएसला धन्यवाद देऊ इच्छतो, कारण ज्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय काढला होता, त्यांनाच त्या थडग्यात गाडलं. जे राज्यात सध्या घडत आहे, त्यावर न बोलता, जुन्या कुठल्यातरी गोष्टींवर बोलत राहायचं. त्यावरून दंगली घडवायच्या, याचा आता राज्यात सगळ्यांना कंटाळा आला आहे. म्हणून मी आरएसएसला मुद्दामहून धन्यवाद देत आहे. नागपुरात दंगल जेव्हा घडली, किंवा घडवली, त्यामध्ये महिला पोलिसांवर ज्यांनी हात उचलला असेल त्याचे हात छाटले पाहिजेत. त्याचबरोबरीने ज्याने जाणीवपूर्वक दंगल भडकावली असेल, त्याला कायद्याचा इंगा दाखवायला हवा.”
Comments are closed.