Mumbai Rains Updates – मुंबईत चार दिवसांत १,६४५ कोटी लिटर पावसाच्या पाण्याचा उपसा, BMC ची माहिती
मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. अशातच मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची माहिती समोर येत आहे. यातच मुंबईत १६ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२५ दुपारी १२ वाजेपर्यंतच्या चार दिवसांत तब्बल १,६४५.१५५ कोटी लिटर (१६,४५१.५५ दशलक्ष लिटर) पावसाच्या पाण्याचा उपसा सहा उदंचन केंद्रांमधून करण्यात आला आहे, अशी माहिती बीएमसीने दिली आहे. यासाठी ४३ पंपांनी एकूण ७६१ तास ३८ मिनिटे कार्यरत राहून ही कामगिरी केली.
उदंचन केंद्रांची माहिती:
१. ईर्ला: ८ पंप, ४८,००० लिटर/सेकंद, ३,७६८.४८ कोटी लिटर
२. क्लिव्हलँड बंदर: ७ पंप, ४२,००० लिटर/सेकंद, २,९०६.०२ कोटी लिटर
३. गजदरबंध: ६ पंप, ३६,००० लिटर/सेकंद, २,८७०.११ कोटी लिटर
४. लव्हग्रोव्ह: १० पंप, ६०,००० लिटर/सेकंद, २,८२६.५० कोटी लिटर
५. हाजी अली: ६ पंप, ३६,००० लिटर/सेकंद, २,३७९.७८ कोटी लिटर
६. ब्रिटानिया: ६ पंप, ३६,००० लिटर/सेकंद, १,७००.६० कोटी लिटर
एकूण: ४३ पंप, २,५८,००० लिटर/सेकंद, १,६४५.१५५ कोटी लिटर
मुंबईत सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी बीएमसीने ५४० उदंचन पंप तैनात केले आहेत. आज, १९ ऑगस्ट रोजी शहरात अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली असून, गेल्या सहा तासांत या पंपांद्वारे १८२.५ कोटी लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला आहे.
🌧 बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक १६ ऑगस्ट ते दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ४ दिवसांच्या कालावधीत, ६ उदंचन केंद्रामधून मिळून तब्बल १६,४५१.५५ दशलक्ष लीटर (१,६४५.१५५ कोटी लीटर) एवढ्या पाण्या्चा उपसा करण्यात आला आहे.
🔹या ४ दिवसांत ६ उदंचन केंद्रातील… pic.twitter.com/ykj3edx518
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) ऑगस्ट 19, 2025
Comments are closed.