सुनील केदारांनी भाजपची सुपारी घेऊन पंजा गोठवला, RSS च्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी; काँग्रेस प


नागपूर काँग्रेस : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच नागपूर काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. जागावाटप, उमेदवारी आणि गटबाजीवरून माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत असून, पक्षातील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

काँग्रेसचे माजी महासचिव मुजीब पठान यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र पाठवून सुनील केदारांविरोधात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. सुनील केदार यांनी भाजपची “सुपारी” घेत बुटीबोरीत काँग्रेसचा पंजा “गोठवला”, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. बुटीबोरीत सुनील केदार यांनी RSS च्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी दिली, असा आरोप देखील पत्रात करण्यात आला आहे.

Nagpur Congress: बुटीबोरी नगर परिषदेच्या निवडणुकीतून पंजा गायब

बुटीबोरी नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे चार उमेदवार असताना एकालाही एबी फॅार्म देण्यात आला नाही. त्यामुळे एका प्रकारे बुटीबोरी नगर परिषदेच्या निवडणुकीतून पंजा गायब असल्याचे चित्र आहे. सुनील केदार यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय केला असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी हायकमांडकडे करण्यात आली आहे. आता काँग्रेस हायकमांड सुनील केदार यांच्यावर काही कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Nagpur Congress: सुनील केदारांवर आणखी गंभीर आरोप

काँग्रेसमधील इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही सुनील केदारांवर आरोपांची मालिका सुरू केली आहे. बँक घोटाळा प्रकरणात तब्बल 1200 कोटींची रिकव्हरी निघाल्याने सुनील केदार यांनी एक प्रकारे भाजपसाठी सुपारी घेऊन काँग्रेसमध्ये उमेदवारी दिल्याचाही गंभीर आरोप काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा अष्टेकर यांनी केला आहे. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आयात केलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचे आरोप ही त्यांनी केलाय. डिगडोह आणि बुटीबोरीमध्ये काँग्रेसचा एबी फॉर्म न देता भाजपच्या भूतपूर्व कार्यकर्त्यांना पाठिंबा दिल्याची नोंद आहे. या गोंधळामुळे कामठीचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते अन्सारी यांनी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्याचे बाबा अष्टेकर यांनी म्हटले आहे. तसेच बुटीबोरी नगराध्यक्ष पदासाठी RSS कार्यकर्ता सुमित मेंढे यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिल्याच्या आरोपावरून असंतुष्ट काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे तातडीची कारवाईची मागणी केली असून, “कारवाई न झाल्यास आम्ही थेट दिल्लीला जाऊन आंदोलन करू,” असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागपूर काँग्रेसमध्ये पक्षातील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा

Nagpur News : नागपुरातील काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच! पक्षात सुनील केदारांची हुकूमशाही; बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम

आणखी वाचा

Comments are closed.