Nitesh Rane’s harsh criticism after Abu Azmi’s controversial statement regarding Wari


समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी रविवारी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी अबू आझमी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अबू आझमी यांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली आहे.

मुंबई : दोन दिवस पुण्यात मुक्काम केल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी रविवारी (22 जून) पुढील मुक्कामासाठी रवाना झाली आहे. दोन्ही पालख्यांनी रविवारी सासवडला मुक्काम केला. मात्र समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी रविवारी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी अबू आझमी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अबू आझमी यांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली आहे. (Nitesh Rane’s harsh criticism after Abu Azmi’s controversial statement regarding Wari)

अबू आझमींनी वारीसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी नितेश राणेंना प्रश्न विचारला असता, त्यांनी संताप व्यक्त करत अबू आझमींचा एकेरी उल्लेख केला आहे. नितेश राणे यांनी म्हटले की, दर शुक्रवारी जे रस्त्यावर नमाज अदा करतात, त्यावर आझमीसारखं कार्ट काहीच बोलताना दिसत नाही. परंतु आमचा महाकुंभवर आणि आमची वारी सुरू झाली तर त्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न होता. अबू आझमींना एवढंच सांगू इच्छितो की, आमची वारी वर्षभर नसते, तुमची नमाज दररोज असते. त्यावर अबू आझमींनी आपलं थोबाड उघडावं. तुमचं वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही. जर आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का? असा प्रश्न उपस्थित करत नितेश राणे म्हणाले की, वारीवर बोलण्याची कोणी हिंमत करू नये. आमची वारी अशीच सुरू राहणार आहे, असा सज्जड दमही नितेश राणे यांनी दिला.

हेही वाचा – Bhaskar Jadhav : मी सगळ्यांशी बोलून…; नाराजीमुळे चर्चेत असलेल्या भास्कर जाधवांनी स्पष्टच सांगितले

काय म्हणाले होते अबू आझमी?

माध्यमांशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले होते की, आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात? याची तक्रार केलेली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते, तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात. अशावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करू. तर दुसरीकडे मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं की, लवकर जा अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, तरीही आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी करत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut on Gulabrao Patil : भय अन् भष्ट्राचारामुळेच शिवसेना-राष्ट्रवादी फुटली, संजय राऊतांचे टीकास्त्र



Source link

Comments are closed.