वाशीत बेकायदा फेरीवाल्यांचा धुमाकूळ, शिवसेनेची विभाग कार्यालयावर धडक

नवी मुंबई शहराची विशेष ओळख असलेल्या वाशीमध्ये सध्या विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. बाजारपेठ म्हणून ओळख असलेले हे उपनगर बेकायदा फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडले आहे. गटारांची व्यवस्थित साफसफाई झाली नसल्यामुळे थोडा पाऊस पडला तरी पाणी तुंबत आहे. याचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी आज नवी मुंबई महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयावर धडक दिली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने छेडलेल्या या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे,उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकर्णी, उपशहरप्रमुख महेंद्र धुमाळ, मुरली पाटील, उपशहर संघटक सोनाली कदम, विनोदिनी आहिरे, विभागप्रमुख रावसाहेब जाधव, मोरेश्वर ठाकूर, नितीन देसाई, उपविभागप्रमुख अशोक भुवड, प्रकाश ओंबळे, शांताराम भेकरे, अपर्णा दुराफे, दिलीप चरवळ आदी सहभागी झाले होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांची भेट घेऊन याप्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली.

Comments are closed.