क्रिकेटविश्वात शोककळा, मुंबईचे दिग्गज फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचे निधन
डावखुरा फिरकीपटू असलेल्या शिवलकर यांनी वयाच्या 22व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. ते जवळजवळ 50व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळले. 1960 ते 1988 या कालावधीत त्यांनी 124 प्रथम श्रेणी सामने खेळून 589 विकेट्स घेतल्या. रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी 361 विकेट्स मिळवल्या आणि 11 वेळा 10 विकेट हाॅल घेण्याचा पराक्रम केला.
मुंबईच्या संघासोबत त्यांनी 10 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली. सात वर्षांच्या कालावधीनंतर त्यांनी पुनरागमन करून 47व्या वर्षी दोन सामने खेळले. त्यांच्या अप्रतिम फिरकीमुळे अनेक मोठ्या फलंदाजांना अडचणीत टाकले.
2017 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांना प्रतिष्ठित सीके नायडू ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले. सुनील गावस्कर यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास ठेवला होता, परंतु भारतीय संघात त्यांना संधी मिळू शकली नाही, ही त्यांचीच नव्हे, तर अनेक चाहत्यांचीही खंत राहिली. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटविश्वाला मोठी हानी झाली आहे. पद्माकर शिवलकर यांचे योगदान कायम स्मरणात राहील.
मुंबई क्रिकेटने आज एक खरी आख्यायिका गमावली आहे. खेळामध्ये पद्मकर शिवलकर सर यांचे योगदान, विशेषत: आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक म्हणून नेहमीच लक्षात ठेवले जाईल. त्याचे समर्पण, कौशल्य आणि मुंबई क्रिकेटवरील परिणाम अतुलनीय आहेत. त्याचे निधन एक अपरिवर्तनीय आहे… pic.twitter.com/nmca72cnfb
– अजिंक्य गुलाब – अध्यक्ष, एमसीए. (@ajinkyasnaik) 3 मार्च, 2025
Comments are closed.