पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरेल, सीतारामन यांचा हल्लाबोल, ADB च्या अध्यक्षाकडे महत्वाची मागणी
एफएम निर्मला सिथारामन: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी आशियाई विकास बँकेचे (एडीबी) अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाकिस्तानला देण्यात येणारा निधी कमी करण्याची मागणी केली. 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एडीबी अध्यक्षांकडे ही मागणी केली आहे.
इटलीत आशियाई विकास बँकेची वार्षिक बैठक
इटलीतील मिलान येथे झालेल्या 58 व्या आशियाई विकास बँकेच्या (ADB) वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (५ मे) एडीबीचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेतली. याशिवाय, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इटलीचे अर्थमंत्री जियानकार्लो जॉर्जेट्टी यांच्याकडेही ही मागणी मांडली आहे. दरम्यान, एडीबीचे अध्यक्ष मसातो कांडा यांच्याशी झालेल्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “भारत खासगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करत आहे आणि देशात एक धोरणात्मक आणि नियामक परिसंस्था तयार करत आहे.
भारतासोबत वाढत्या तणावामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने सोमवारी (५ मे) एका अहवालात म्हटले आहे की, भारतासोबत वाढत्या तणावामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो आणि त्यांच्या चालू आर्थिक सुधारणा प्रयत्नांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय, या तणावांचा पाकिस्तानच्या बाह्य वित्तपुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो आणि पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावरही दबाव येऊ शकतो, जो पुढील अनेक वर्षांसाठी कर्ज फेडण्यासाठी देखील खूपच कमी आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील हा तणाव वाढला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय नागरिकांसह एकूण 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठी पावले उचलली आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद करण्याचा निर्णय देखील घेतला. पाकिस्तानातून होणारी संपूर्ण आयात बंद करण्यात आली आहे. वाघा अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे.
https://www.youtube.com/watch?v=pzc11-wonxg
महत्वाच्या बातम्या:
China : जग भारतासोबत, मात्र चीनची उलटी चाल… दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा जाहीर, चीनी राजदूतांच्या भेटीनंतर पाकच्या माध्यमांचा दावा
अधिक पाहा..
Comments are closed.