Anil Parab vs Shambhuraj Desai : शिंदेंची खाती इतर मंत्र्यांकडे, परब-शंभूराज सभागृहात भिडले
Anil Parab vs Shambhuraj Desai : शिंदेंची खाती इतर मंत्र्यांकडे, परब-शंभूराज सभागृहात भिडले
Desai VS Parab : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवशेनाच्या आजच्या मंगळवारच्या कामकाजावेळी विधान परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई एकमेकांशी भिडल्याचे दिसून आले. सभागृहामध्ये अनिल परब यांनी आपलं म्हणण मांडताना म्हटलं की, या सभागृहाचे नियम या सभागृहाच्या परंपरा आणि सभागृह कसा चालवणं हे आपल्या अधिकार कक्षात येतं, ज्यावेळी विधानसभेचं अधिवेशन चालतं त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बऱ्याच वेळेला बिझी असतात त्यांच्याकडे वेगवेगळी जबाबदारी असते आणि ते आपल्या खात्याचा कारभार दुसऱ्यांकडे देतात. आम्ही आपल्याकडे मागणी करतो, कुठल्या खात्याचे मंत्री आणि ज्यावेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही मान्य करत होतो, मुख्यमंत्र्यांचे अधिकार दुसऱ्या मंत्रांना दिले आहेत, ते उत्तर देत आहेत, परंतु आता त्या खात्याचा राज्यमंत्री आज आहे आणि राज्यमंत्री असताना देखील मंत्री जर येऊन मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचे विषय जर हाताळत असतील, तर योग्य आहे का? त्या राज्यमंत्र्यांच्या अधिकार कमी आहेत का? ते राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? राजमंत्र्यांचा असा अवमान करण्याचा अधिकार आपल्या सभागृहात नाही. आम्ही देखील अनेक वर्ष आमदार आहे, ज्या वेळेला मंत्री उपलब्ध नसतो, त्या वेळेला राज्यमंत्री सभागृहात उत्तर देतो, मग राज्यमंत्री केलेत कशाला, राज्यमंत्र्यांना जर हे उत्तर देण्यासाठी वरच्या सभागृहात पाठवत नसेल, तर या राज्यमंत्र्यांना काम काय? अगदी तुमचा कोणावर विश्वास नसेल तर कॅबिनेट दर्जा दिला ना त्यांना तरी द्या उत्तर द्यायला दुसरे, तुम्ही फक्त अहवाल मांडायला ठेवलं आहे का? प्रदर्शन करायला ठेवलं आहे का? तुम्ही राज्यमंत्र्यांना अधिकार देत नाही, सभागृहांमध्ये हे काय चाललं आहे, मी आपल्याकडे मागणी करतो. तुम्ही कुठले उत्तर दिले, मान्य करू, कारण आम्हाला तुमच्या कॅपॅसिटीच्या बद्दल पूर्ण माहिती आहे. परंतु राज्यमंत्र्यांना उत्तर द्यायला येत नाही, राज्यमंत्री सभागृहात असताना दुसऱ्या खात्याचा मंत्री तिसऱ्या खात्याचे उत्तर देतो आणि आश्वासन दिल्यानंतर ह्या विषयांनी निकाली काढलं जात नाही, आश्वासन दिल्यानंतर त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, समित्यांच्या बैठकीत मंत्री उत्तर देत नाहीत, या विषयांचा काहीतरी करा, काहीतरी निर्देश द्यावे, राज्य मंत्र्यांनी त्याचे उत्तर द्यावं, अन्यथा जो दुसरा मंत्री देईल उत्तर त्या मंत्र्यांनी त्या उत्तराची जबाबदारी घेतली पाहिजे, नाहीतर नाईलाजास्तव त्याच्यावरतीच हक्क भंग आणला तर तो म्हणतो मी त्या खात्याचा मंत्रीच नाही. मी फक्त विधानसभेच्या कामकाजापुरतामंत्री आहे. याबाबतीत तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं, कारण आपल्याकडूनच मार्गदर्शनाची अपेक्षा आहे, दुसरीकडे आमचा कोणी वाली नाही, आपण एकमेव आमचे वाली आहात, तुम्ही आम्हाला जर वाऱ्यावर सोडलं तर या सभागृहात आम्ही कशाला यायचं हाच एक मोठा प्रश्न आहे असं म्हणत अनिल परब यांनी आपला संताप व्यक्त केला.
Comments are closed.