Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर – संजय राऊत
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर – संजय राऊत
ही भूमिका योग्यच होती. त्यानंतर काँग्रेस पक्ष आहे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 लोक आहेत. तरी आम्ही ही जागा शरद पवार यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून ती जागा शरद पवारांनी परत जावं राज्यसभेत यासाठी हा निर्णय आम्ही घेतला. चर्चा झाली उद्धवजीं बरोबर काँग्रेसच्या नेत्यां बरोबर शरद पवारांचे जे राजकारणातलं स्थान आहे समाजकारणातलं स्थान आहे महाराष्ट्रातलं देशाचं त्यांचं जे नेतृत्व आहे त्याच्यामुळे ही जागा आम्ही सन्माननीय शरद पवार यांच्यासाठी तिघांनी मिळून जाहीर केलेली आहे. आमचं जेवढं जेवढी संख्या लागते जिंकण्यासाठी आमदारांची तेवढी आमच्याकडे आहे एवढंच मी सांगू शकतो. आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडी येणाऱ्या अशा प्रकारच्या निवडणुका मग राज्यसभा विधान परिषद यासाठी काय निर्णय घ्यायचे आणि कोणी कुठली निवडणूक लढायची यासाठी आम्ही लवकरच तीन पक्ष एकत्र बसण्याचं ठरलेलं आहे. कारण शेवटी तिन्ही पक्षाचा आपला वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभा मिळाल्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चर्चा आहे. राहुल साहेब महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय एकमताने जरी झाला असला तरी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची भेट एनसीपीच्या नेत्यांनी घेतली त्यात अशी एक अट ठेवण्यात आल्याचं कळतंय की दोन्ही एनसीपीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबण्या थांबवण्याची घोषणा करा तरच शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा मिळेल. नाही नाही ही भूमिका जयंत पाटील यांनी ती घोषणा केल्यानंतर शरद पवारांच्या बाबतीत निर्णय घोषित करण्यात आला. बघा ही काल जयंतराव पाटील यांनी त्यांच्या पक्षातर्फे भूमिका स्पष्ट केली. मुळात माझं असं मत पहिल्यापासून होतं अजित दादा असल्यापासून ह्या विलीनीकारण वगैरे दंतकथा आहेत. त्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नाही. पण काही लोकांना वाटत असेल. पण ही दंतकथा होती. ती दंतकथा आता संपलेली आहे. आम्हाला सगळ्यांना एकत्र यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच काम करावं लागेल. आणि आमची ती मानसिक तयारी आहे. सत्ता येते सत्ता जाते. आम्हाला जनतेने विरोधी पक्षामध्ये जबाबदारी दिलेली आहे ती आम्हाला योग्य पद्धतीने पार पडली पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्व सरकार अपयशी ठरलेली आहेत भाजपची. प्रश्नांचा डोंगर आहे. अशा वेळेला जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल. जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी उगाच सत्तेच्या मागे आता धावू नये. येणार्या पुढल्या निवडणुकांची तयारी करावी आणि लोकांपर्यंत पोहोचावं. हे आमच्या सगळ्यांचं मत आहे. राहुल साहेब प्रियंका चतुर्वेदींनी एक ट्विट केलंय आणि त्यांनी म्हणत त्यात नमूद केलंय की मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी ज्यांनी प्रार्थना केल्या त्यांची विशेष आभार मानते. ठीक आहे त्यांच्यासाठी सगळ्यांचाच प्रार्थना होत्या शिवसेनेमध्ये. त्या आमच्या सहकारी होत्या. प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या. पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवाने राज्यसभेच्या बाहेर राहावं लागलं. जर गणित जमलं असतं जर पवार साहेब निवडणुकीला उभे राहिले नसते तर ही जागा शिवसेना 100% लढून विद्यमान राज्यसभा सदस्य चतुर्वेदी यांना ती जागा द्यायला कोणाचीच अडचण नव्हती. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पक्षामध्ये सगळ्यांची इच्छा होती की जागा शिवसेनेने लढवावी. पण जेव्हा पवार साहेबांसारखा नेता उभा राहतो आणि सगळ्यांनी ठरतंय की बाबा आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि तेवढा आकडा शिवसेनेकडे किंवा अन्य कोणत्या पक्षाकडे नाही. हे सत्य आहे. राहुल साहेब काल रोहित पवारांनी राहुल साहेब राज्यसभेचा राज्यसभेचाच विषय आहे की भाजपने चार उमेदवार जे घोषित केले आहेत त्यात रामदास आठवले यांना त्यांनी पुन्हा राज्यसभेवर पाठवलंय दोन नवीन चेहरे पण लक्षवेधी उमेदवारी आहे ती विनोद तावडे यांची. बरं जवळपास 2019 ला त्यांना विधानसभेत नाकारण्यात आलं पक्षातर्फे उमेदवारी आणि त्यानंतर जवळपास सहा ते सात वर्ष पक्ष संघटनेसाठी काम केल्यानंतर त्याचं फळ म्हणून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलंय त्यांचं राज्यसभेवर म्हणजे राजकीय पुनर्वसन असल्याचंही म्हटलं जातं. हं राजकीय पुनर्वसन आहे असं मला वाटत नाही. कारण विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते जे पक्षांमध्ये असतात कोणत्याही पक्षांमध्ये असतात. ते सतत पक्षाच्या काम करत असतात. मी विनोद तावडे यांना अनेक वर्ष ओळखतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून हे त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे. ते मग महाराष्ट्र असेल दिल्ली असेल बिहार सरकार असेल राज्यात त्यांनी काम केलं केरळला काम केलं. अशा वेळेला जर पक्षानं त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि उमेदवारी दिली तर तो एका कार्यकर्त्याचा सन्मान असतो. महाराष्ट्रातून त्यांना काही लोकांनी राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातून एका विशिष्ट गटानं विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हाचं चित्र होतं. पण विनोद तावडे हे नाव मेद न होता त्यांनी आपलं संघटनेतलं कार्य संघटना बांधण्याचं कार्य त्यांच्या पक्षाच्या कायम ठेवलं. ते दिल्लीमध्ये सुरुवातीला पक्ष सचिव म्हणून गेले. मग ते सरचिटणीस झाले. मग त्यांच्यावर अनेक राज्यांची जबाबदारी दिल्यावर त्यांनी जी मर्दी संपादन केली नेतृत्वाची त्यांच्या त्याच्यामुळे त्यांना हे यश मिळालेलं आहे आणि त्याचं कार्यकर्त्याला जेव्हा अशा प्रकारचं त्याचा गौरव केला जातो तेव्हा कोणताही पक्षातल्या कार्यकर्त्याचं कौतुक केलं पाहिजे. भारतीय जनता पक्षानं जे उमेदवार दिलेले आहेत ते कौतुक करण्यासारखेच आहेत. याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. नाही पण राहुल साहेब आणखी एक राज्यसभा उमेदवारी सध्या देशात चर्चेचा विषय आहे ती म्हणजे बिहारमध्ये असं म्हटलं जातंय नितीश कुमार किंवा त्यांचे सुपुत्र हे राज्यसभेवर जाऊ शकतात आणि अशा वेळेस बिहारचं नेतृत्व भाजपकडे येऊ शकतं. बघा भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या जागा या जनता दल युनायटेड पेक्षा जास्त आहेत. आणि जवळजवळ 40 जागा जास्त आहेत माझ्या माहितीप्रमाणे. नितीश कुमार यांचा सन्मान म्हणून त्यांनी त्यांना सुरुवातीला मुख्यमंत्री पद दिलं पण नितीश कुमार यांची प्रकृती आणि मानसिक स्वास्थ्य ठीक नाही अशी एक माहिती सातत्याने समोर येते आपण पाहतोय सगळे टीव्हीला. त्याच्यामुळे जर भारतीय जनता पक्षानं असा निर्णय घेतला असेल की नितीश कुमारांना राज्यसभेत पाठवून बिहारचं नेतृत्व भाजपच्या नेत्याकडे द्यावं तर हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यात काही चुकतंय असं मला वाटत नाही. राहुल साहेब रोहित पवारांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते म्हणाले की जसं सुशांत सिंह प्रकरणामध्ये दोन दिवसांमध्ये सीबीआयने चौकशी सुरू केली होती मात्र अजित दादांच्या प्रकरणाच 18 दिवस उलटूनही सीबीआय चौकशी करत नाही काहीतरी गडबड आहे असं ते म्हणाले. रोहित पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काल अजित दादांचा अपघात घातपात संशय अस्पद अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली. रोहित पवारांनी त्यांना काही प्रेझेंटेशन दिलं. त्याच्यावरती उद्धव साहेबांचं स्पष्ट मत आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी ही करावीच लागेल व्हायलाच हवी. अजित दादा पवार यांच्या बाबतीत त्यांचं कुटुंब काही बोलायला तयार नाही. भारतीय जनता पक्ष काही बोलायला तयार नाही. इतर कोणी बोलायला तयार नाही काय तुम्ही दडवताय? काय लपवताय असं काय रहस्य आहे? हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे.
राजकारण व्हिडीओ
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर – संजय राऊत
शॉर्ट व्हिडीओ
आणखी पाहा
Comments are closed.