जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार
जान धन खाते केवायसी नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनधन योजनेला (PMJDY) 10 वर्षांपेक्षा अधिक वर्ष पूर्ण झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार बँक खातं उघडल्यानंतर दरवर्षी केवायसी करणं आवश्यक आहे. ज्या खातेदारांचं कोणत्याही बँकेत जनधन खातं असेल तर त्यांना केवायसी प्रक्रिया (Know Your Customer) पूर्ण करावी लागेल.30 सप्टेंबरपर्यंत जनधन खात्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यास बँक खातं बंद होऊ शकतं. त्यामुळं विविध सरकारी योजनांद्वारे मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम मिळणं बंद होऊ शकतं.
जनधन योजनेची केवायसी आवश्यक Jan Dhan account KYC
प्रधानमंत्री जनधन योजना 2014 मध्ये सुरु करण्यात आली आहे. याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना बँकिंगशी जोडण्याचा होता. जनधन खातं उघडल्यानंतर त्यांच्यापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. या योजनेत शहरातील लोकांसह ग्रामीण भागातील लोकांची खाती उघडण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्याला किमान शिल्लक रकमेबाबतचा नियम लागू नाही. खातेधारक ओवरड्राफ्ट सुविधेचा फायदा देखील घेऊ शकतात. म्हणजेच खात्यात पैसे नसताना देखील खातेधारक खात्यातून पैसे काढू शकतो. त्यासाठी एक मर्यादा निश्चित केलेली असते. बँक ओवरड्राफ्टच्या रुपात काढलेल्या पैशांवर व्याज आकारते.
री केवायसी का गरजेची ?
2014-2015 मध्ये उघडण्यात आलेल्या खात्यांची पुन्हा केवायसी करणं आवश्यक आहे. कारण, केवायसीची मुदत 10 वर्ष आहे. बँक खातं सक्रीय ठेवण्यासाठी रीकेवयसी करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये तुम्ही बँकेला तुमची अपडेटेड माहिती देता. ज्यात सध्याचा पत्ता, नाव, अपडेटेड फोटोचा समावेश असतो. फसवणूक टाळण्यासाठी आणि बॅकिंग सेवा योग्यपणे सुरु राहण्यात मदत मिळते. देशातील सरकारी बँका 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ग्रामपंचायत पातळीवर केवायसीसाठी शिबिरं आयोजित करत आहे. याद्वारे घरोघरी जाऊन केवायसी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आता पर्यंत 100000 ग्रामपंचायतीमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. लाखो खातेदारांनी ई केवायसी पूर्ण केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.