Prakash Ambedkar criticizes Narendra Modi over war between Israel and Iran


इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या आठवड्याभरापासून युद्ध सुरू असून दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहचला आहे. इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीवरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

मुंबई : इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या आठवड्याभरापासून युद्ध सुरू असून दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहचला आहे. इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीवरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. इराणसारखा देश अमेरिकेला भीक घालत नाही आणि दुसरीकडे अमेरिकेच्या दबवानंतर नरेंद्र मोदींनी युद्धबंदी जाहीर केली होती. कारण आपले पंतप्रधान भित्री भागूबाई आहेत, अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. (Prakash Ambedkar criticizes Narendra Modi over war between Israel and Iran)

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लुटुपुटूची लढाई झाली होती, असे मी मानतो. कारण आपल्या लष्कराचे म्हणणे वेगळे होते. एकदाच आम्ही पाकिस्तानला संपवू, अशी आपल्या लष्कराची भूमिका होती. मात्र सध्याचं राजकीय नेतृत्व हे कमकुवत कणा नसेलेलं आहे. कारण इराणसारखा देश अमेरिकेला भीक घालत नाही, पण नरेंद्र मोदी इराणसारखी भूमिका त्यावेळी घेतली नव्हती. उलट अमेरिकेच्या दबवानंतर नरेंद्र मोदींनी युद्धबंदी जाहीर केली होती. कारण आपले पंतप्रधान भित्री भागूबाई आहेत, हे सिद्ध झालं आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

हेही वाचा – Congress : खोदा पहाड़ निकला चूहा, जनगणनेच्या अधिसूचनेवर काँग्रेसचा टोला; मोदींवर साधला निशाणा

एकदा लष्कराला अधिकार दिल्यानंतर त्यामध्ये पंतप्रधानांनी घुसायची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन दिवसात हवाई दलाने पाकिस्तानसोबतच्या युद्धावर नियंत्रण मिळवलं होतं. पाकिस्तान सात दिवसांपेक्षा जास्त लढू शकत नव्हता. अशावेळी 1971 च्या युद्धाची पुनरावृत्ती करण्याची संधी होती. पण मोदी सरकारने ही संधी गमावली. त्यामागे काय कारण आहे हे भाजपाने स्पष्ट करावं. कारण पहलगामबाबत जी लढाई झाली त्याचे नियंत्रण हे ट्रम्प यांच्याकडे होतं. भारत-पाकिस्तानने किती दिवस लढायचं? कधी थांबायचं? हे ट्रम्प यांनी ठरवलं. ट्रम्प यांनी केलेला दावा खोडून काढण्याची धमकही नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

⁠शासनाने शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुंबईमधील घाटकोपर रमाबाई नगर येथे राहणारे मुरली नाईक यांना पाकिस्तानविरोधातल्या युद्धामध्ये वीरगती प्राप्त झाली होती. मात्र युद्धात शहीद झालेत त्यांना जो दर्जा मिळतो किंवा लाभ मिळतात ते अग्निविरांना मिळत नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र शासनाने अग्निविरांना वीरगती प्राप्त झाली, तर मदत करण्याचं जाहीर केलं होतं. पण दुर्दैवाने केंद्रशासन आणि महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारची मदत द्यायला तयार नाही. त्यामुळे मी ⁠मुख्यमंत्र्यांकडे यासंबंधी वेळ मागितला आहे. या संदर्भात केद्र आणि राज्याने न्याय दिला नाही तर मी न्यायालयाेच दरवाजे ठोठावणार. कारण एखाद्या सैन्याला वीरगती प्राप्त झाली, तर शासनाकडून एक कोटी दिले जातात. पण मुंबईमधील मुरली नाईक यांना तशी मदत अद्यापही मिळालेली नाही. ⁠शासनाने मुरली नाईक यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे. तसेच कुणीही शहीद झाले, मग त्यामध्ये अग्निवीर जरी असले तरी, त्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली.

हेही वाचा – Politics : आम्ही दोघेही मिळून काम करतोय; निवडणुकीसाठी पटोलेंची शिंदेंच्या शिलेदारासोबत हातमिळवणी



Source link

Comments are closed.