Pranab Mukherjee's memorial to be built at Rajghat.

माजी राष्ट्रपतींच्या स्मारकाला केंद्र सरकारची मंजुरी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. त्यांचे स्मारक राजघाट संकुलातील राष्ट्रीय स्मृतीस्थळ परिसरात उभारले जाईल. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 31 ऑगस्ट 2020 रोजी दिल्लीत वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले होते. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, त्यांची समाधी राष्ट्रीय स्मृती परिक्रमेमध्ये विकसित केली जाईल. याठिकाणी माजी राष्ट्रपती, उपाध्यक्ष आणि पंतप्रधान यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांची स्मारके आहेत. राजघाट संकुलात समाधी साकारणाऱ्यांमध्ये प्रणव मुखर्जी हे पश्चिम बंगालमधील पहिले राष्ट्रीय नेते ठरतील.

दिल्ली शहरी कला आयोगाने (डीयूएसी) 2026 मध्ये स्मारकाच्या आराखड्यात काही बदल सुचवले असून, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘डीयूएसी’कडे एक सुधारित प्राथमिक प्रस्ताव सादर केला आहे. यासंबंधी आता पुढील प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग स्मारकासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टकडून निधी मिळण्याची प्रतीक्षा करत आहे.

काँग्रेस राजवटीत स्वतंत्र समाधी बांधण्याच्या प्रथेवर बंदी घालण्यात आली होती. तथापि, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नंतर माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि अटलबिहारी वाजपेयी यांची स्मारके उभारल्यानंतर आता प्रणव मुखर्जी यांच्या समाधीलाही मंजुरी दिली आहे. राजघाट आणि संबंधित स्मारकांचे संकुल सुमारे 245 एकरमध्ये पसरलेले आहे. याची सुरुवात महात्मा गांधींच्या समाधीने होते.

काँग्रेस राजवटीत राजघाटावर शेवटची समाधी 1999 मध्ये माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या ‘कर्मभूमी’ समाधीच्या रूपात बांधण्यात आली होती. यानंतर स्वतंत्र समाधींचे धोरण बंद करण्यात आले. मात्र, केंद्रात भाजपचे सरकार स्थानन्न झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या स्मारकाच्या बांधकामावर काँग्रेसने घातलेली बंदी उठवली होती.

 

रालोआच्या कार्यकाळात बांधलेल्या प्रमुख समाधी

पी. व्ही. नरसिंह राव : ज्ञान भूमी (2015)

अटल बिहारी वाजपेयी: नेहमी अटल (2018)

प्रणव मुखर्जी : (2026 मध्ये मंजुरी)

 

काँग्रेस राजवटीत बांधलेल्या प्रमुख समाधी

महात्मा गांधी (1948): राजघाट

जवाहरलाल नेहरू (1964): शांतीवन

लाल बहादूर शास्त्रर (1966): विजय घाट

संजय गांधी (1980)

इंदिरा गांधी (1984) : शक्ती स्थळ

जगजीवन राम (1986) : समता स्थळ

चौधरी चरण सिंग (1987): किसान घाट

राजीव गांधी (1991) : वीर भूमी

ललिता शास्त्र (1993)

ग्यानी झैल सिंग (1994) : एकता स्थळ

शंकर दयाळ शर्मा (1999) : कर्मभूमी

Comments are closed.