पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जळफळाट; पूर्ण ताकदीनं उत्तर देऊ, शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. पाकिस्तानचे नेत हिंदुस्थानविरोधात गरळ ओकत आहेत. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाद शरीफ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून हिंदुस्थानला युद्धाची धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या हक्काचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल, अशी दर्पोक्ती शरीफ यांनी केली.
Comments are closed.