Photo : मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार बरसला, नागरिकांची दाणादाण
मुंबई : 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात 16 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. रविवारी (15 जून) रात्रीपासून सतत बरसणार्या पावसाने सोमवारी सकाळी आपला जोर वाढवत मुंबईसह कोकणाला चांगलाच तडाखा दिला. (सर्व छायाचित्रे : दीपक साळवी)
बरेच दिवस विश्रांती घेतल्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
सोमवारी दुपारी समुद्रात जोरदार लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याने सर्व चौपाट्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नदी नाल्यांसह शहरांतील रस्ते-रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबई उपनगरात पावसाचा जोर चांगलाच असल्याने बांद्रा येथे वाहतूक कोंडी झाली.
हवामान विभागाने पुढील 24 तासांकरिता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
Comments are closed.