Ramdas Kadam criticizes the talks about Raj Thackeray and Uddhav Thackeray coming


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून अप्रत्यक्षपणे एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाकडून टीका होताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यभर रंगली आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून अप्रत्यक्षपणे एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाकडून टीका होताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Ramdas Kadam criticizes the talks about Raj Thackeray and Uddhav Thackeray coming)

मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या युतीच्या चर्चेवर बोलताना रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे हे संधीसाधू नेते आहेत. त्यामुळे राज ठाकरे त्यांच्या जवळ जाणार नाहीत. हे त्यांनाही (उद्धव ठाकरे) माहित आहे. तसेच आदित्य ठाकरेंना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. पण उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा दिला नव्हता. हे राज ठाकरे विसरले नसतील. याशिवाय राज यांचे सात नगरसेवकही याच उद्धव ठाकरे यांनी फोडले होते. याची ही आठवण राज ठाकरे यांना असेल. त्यामुळे राज ठाकरे हे कधीही उद्धव यांच्या बरोबर जाणार नाहीत, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुप्रिया सुळे म्हणतात, आम्ही कोणताही निर्णय…

रामदास कदम म्हणाले की, ठाकरे ब्रँड आता उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. तो आमच्या शिवसेनेकडे आहे. तसेच बाळासाहेबांची शिवसेना, त्यांचे विचार आणि त्यांच्या पक्षाचं चिन्हही आमच्याकडेच आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँड हा आमचा आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत सोयरिक केली त्यांच्याकडे ठाकरे ब्रँड कसा असू शकतो? असा सवाल रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे फक्त हम दो आणि हमारे तीन एवढेच शिल्लक राहणार आहे, हे मी अनेकदा बोललो आहे, असे म्हणत कदम यांनी खिल्ली उडवली.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर शुभेच्छा

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता रामदास कदम यांनी दोन्ही पवार आता एकत्र नाहीत, असं तुम्हाला म्हणायचे आहे का? असा प्रतिप्रश्न केला. रामदास कदम पुढे म्हणाले की, शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशी भूमिका रामदास कदम यांनी मांडली.

हेही वाचा – Devendra Fadnavis : लेखाचं उत्तर लेखानं दिलं; आता राहुल गांधी असं बोलणार नाहीत – फडणवीस



Source link

Comments are closed.