कॅच घेतला, पण गोंधळ उडवला! जडेजा अन् साईकडून मोहीम फत्ते, पण चाहते झाले कन्फ्यूज, जाणून घ्या IC

इंग्लंड विरुद्ध इंडिया पहिला कसोटी दिवस 3: इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया हेडिंग्लेच्या मैदानात यजमान संघाला तगडी लढत देत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा पुन्हा एकदा आपल्या तुफानी कॅचमुळे चर्चेत आला आहे. इंग्लंडच्या जेमी स्मिथने मारलेल्या एका फटक्यावर जड्डूने आपल्या हुशारीचा चांगलाच नमुना दाखवला. त्याला साथ दिली युवा खेळाडू साई सुदर्शनने, ज्याने अफलातून झेल घेत स्मिथला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, या झेलानंतर आता चर्चेत आहे तो म्हणजे एमसीसीचा नवा क्षेत्ररक्षण नियम. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जडेजा-सुदर्शनने मिळून पकडला  झेल, नवीन नियमानुसार वैध मानला जाईल का?

एक कॅच, दोन हिरो! जडेजा-सुदर्शनने मिळून पकडला भन्नाट कॅच

इंग्लिश फलंदाज जेमी स्मिथ अर्धशतकाच्या उंबरठ्यावर उभा होता. आणितो हॅरी ब्रूकसोबत शानदार फलंदाजी करत होता, त्याने 40 धावा काढल्या होत्या. त्यावेळी प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर त्याने एक शानदार शॉट खेळला, त्यात सीमारेषेवर उभ्या असलेल्या जडेजाने तो कॅच केला. पण चेंडू हातात आल्यानंतर त्याने नियंत्रण गमावले, परंतु सीमारेषेच्या पलीकडे जाण्यापूर्वी, जड्डूने चेंडू साई सुदर्शनकडे फेकला आणि भारताला यश मिळाले.

नवीन नियमानुसार कॅच वैध आहे का?

आता प्रश्न असा आहे की नवीन नियम काय म्हणतो आणि जडेजा आणि सुदर्शनचा झेल वैध आहे का? जर आपण अलिकडेच सुधारित केलेल्या नियमाकडे पाहिले तर हवेत उडी मारणारा क्षेत्ररक्षक चेंडूला सीमारेषेच्या आधी फक्त एकदाच स्पर्श करू शकतो.

उदाहरणार्थ, जर जडेजाने चेंडू पकडल्यानंतर तो उडी मारली असती, नंतर सीमारेषेच्या आत गेला असता आणि मैदानात परत झेल पूर्ण केला असता, तर तो बेकायदेशीर घोषित झाला असता. या महिन्यात आयसीसीच्या खेळण्याच्या परिस्थितीत आणि ऑक्टोबर 2026 मध्ये एमसीसीच्या कायद्यात नवीन नियम समाविष्ट केला जाईल. पूर्वी, खेळाडू चेंडूच्या संपर्कात आला तेव्हा तो हवेत असता तर, सीमारेषेच्या बाहेर जाऊन चेंडू अनेक वेळा हवेत उडी मारू शकत होता.

पहिल्या डावात इंग्लंडने केल्या 465 धावा, भारताकडे 6 धावांची थोडीशी आघाडी

यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या शतकांच्या आधारे टीम इंडियाने पहिल्या डावात 471 धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंडने 465 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे, टीम इंडियाने पहिल्या डावात इंग्लंडवर 6 धावांची थोडीशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांच्या पहिल्या डावानंतरही मालिकेतील पहिली कसोटी जवळजवळ बरोबरीत आहे.

हे ही वाचा –

Harry Brook News : चार वेळा बॅटिंग मिळाली, तरी शतक हुकलं! ब्रूकच्या नशिबाने 99 वर मारली कलटी

आणखी वाचा

Comments are closed.