Saamana editorial on eknath shinde group amit shah and maharashtra politics in marathi
शेकडो कोटींची दलाली मिंध्यांच्या तोंडावर फेकली की, मिंध्यांचा बाणा आणि कणा मोडून पडेल. नव्हे, हे अवयव त्यांच्या शरीरात आता उरलेलेच नाहीत. त्यांच्या डोळ्यांदेखत मंत्रिमंडळात मुंबई विकण्याचा सौदा सुरू आहे व हे महाशय लाचारासारखे त्यास मान्यता देत आहेत.
UBT Vs Shinde : मुंबई : शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जून रोजी झाला. या दिवशी दोन्ही शिवसेनेने आपापले स्वतंत्र मेळावे घेतले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावर आता ‘सामना’ या मुखपत्रातून एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. (Tezzbuzz editorial on eknath shinde group amit shah and maharashtra politics)
वर्धापन दिनी झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या बेइमानांना आव्हान दिले की, ‘‘तुम्ही शिवसेना संपवायचं स्वप्न पाहिलंत तरी ते पूर्ण होणे शक्य नाही. शिवसेना आणि ठाकरे ब्रॅण्ड या लोकांना संपवता येणार नाही. मी ठामपणे लढायला उभा आहे. हिंमत असेल तर माझ्यावर चाल करून या, पण येताना ऍम्ब्युलन्स घेऊन या.’’ वास्तविक, ही आव्हानाची भाषा सर्वच महाराष्ट्रद्रोह्यांसाठी होती. यावर सगळ्यात जास्त बुडाला आग लागली ती मिंधे यांच्या, असे ठाकरे म्हणतात. मिंधे म्हणाले, ‘‘मेलेल्यांना मारून काय मिळणार? ते आधीच मेले आहेत.’’ एकनाथ मिंधे यांची ही मरण्या-मारण्याची भाषा म्हणजे त्यांच्या सध्याच्या मानसिक अवस्थेचे दर्शन असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.
फडणवीस मंत्रिमंडळात त्यांची जी अवस्था झाली, त्यामुळे आलेले हे वैफल्य आहे. त्या वैफल्याच्या भरात त्यांनी केलेली बकवास महाराष्ट्रात कोणीच गांभीर्याने घेणार नाही. या गटाच्या मंत्र्यांना अद्यापि स्वतःचे ‘पीए’ नेमता आले नाहीत. एमएमआरडीएमधील तीन हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच हाणून पाडले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी यांच्या भ्रष्टाचाराच्या नाड्या घट्ट आवळून शिस्तीचा पोकळ बांबू घातल्याने ‘एसंशिं’ गटाची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणतात.
हेही वाचा – UBT Vs Shinde : अधःपतनाची ही सगळ्यात खालची पातळी…काय म्हणाले उद्धव ठाकरे
फडणवीस यांची तक्रार करण्यासाठी रात्रीच्या अंधारात ते दिल्लीत जातात. अमित शहांचे जोडे कवटाळून परत येतात. असे हे लोक स्वाभिमानाच्या, मराठी स्वाभिमानाच्या इरसाल बाता करतात तेव्हा गंमत वाटते. ‘‘हिंदुत्वासाठी आपण ‘काय पन’ करायला तयार असल्याचे’’ हे म्हणाले. ‘‘प्रसंगी सत्ताही सोडू’’ अशी थुंकी त्यांनी उडवली. खरं तर या मंडळींना स्वतःचा पक्ष नाही. शिवसेना हा पक्ष चिन्हासह चोरून अमित शहांनी त्यांना दिला हे सत्य कोणी नाकारू शकेल काय? यांच्या गटाचे ‘बाप’ अमित शहा आहेत आणि अमित शहा हेच महाराष्ट्राचे दुश्मन क्रमांक एक आहेत. महाराष्ट्र व मराठी बाणा मारून शहा वगैरे लोकांना मुंबईवर व्यापाऱ्यांचे राज्य आणायचे आहे, असा दावा ते करतात. या मधल्या व्यवहारात मिंधेंचा उपयोग कवडीच्या दलालासारखा झाला. त्यामुळे मराठी माणसाच्या कल्याणासाठी हे काय सत्तात्याग करणार?
बिल्डरांना बळ देऊन धारावीसह मुंबईतून मराठी माणसाला बाहेर फेकण्याचा ‘मेगा प्लॅन’ अमित शहा, फडणवीस वगैरे लोकांनी बनवला आहे. या व्यवहारातील शेकडो कोटींची दलाली मिंध्यांच्या तोंडावर फेकली की, मिंध्यांचा बाणा आणि कणा मोडून पडेल. नव्हे, हे अवयव त्यांच्या शरीरात आता उरलेलेच नाहीत. त्यांच्या डोळ्यांदेखत मंत्रिमंडळात मुंबई विकण्याचा सौदा सुरू आहे व हे महाशय लाचारासारखे त्यास मान्यता देत आहेत, असा घणाघाती हल्लाही ठाकरेंनी शेवटी केला आहे.
Comments are closed.