Saamana editorial on eknath shinde group maharashtra politics shiv sena in marathi


ज्यांचे मीठ खाऊन या पदास ते पोहोचले त्यांनाच गाडण्याची भाषा हे करतात. अधःपतनाची सगळ्यात खालची पातळी गाठल्याचे हे उदाहरण आहे. मिंधे यांचे स्वतःचे असे काहीच नाही.

UBT Vs Shinde : मुंबई : शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जून रोजी झाला. या दिवशी दोन्ही शिवसेनेने आपापले स्वतंत्र मेळावे घेतले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावर आता ‘सामना’ या मुखपत्रातून एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. (Tezzbuzz editorial on eknath shinde group maharashtra politics shiv sena)

महाराष्ट्राच्या राजकारणातील अघोरी विद्येचे जनक एकनाथ मिंधे यांनी त्यांच्या गटाच्या तिसऱ्या वर्धापनदिनी भाषण केले. भाषण मुडद्यांसमोर केले. मुडदेही रोजंदारीवर विकत आणले होते. अघोरी विद्या आणि मुडद्यांचा संबंध असल्याने त्यांनी मुडद्यांत प्राण फुंकण्याचा प्रयत्न केल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याच मिंधे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेस गाडण्याची भाषा पुन्हा केली आहे.

ज्यांचे मीठ खाऊन या पदास ते पोहोचले त्यांनाच गाडण्याची भाषा हे करतात. अधःपतनाची सगळ्यात खालची पातळी गाठल्याचे हे उदाहरण आहे. मिंधे यांचे स्वतःचे असे काहीच नाही. पक्ष चोरलेला, बाप चोरलेला, अमित शहांचे नेतृत्वदेखील भाड्याचे, राजकारणात आणलेला पैसाही चोरीचा. स्वतःचा विचार असा नाहीच, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा – CM Fadnavis : सरकार शब्द फिरवणार नाही, शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक विधान

वर्धापन दिनाच्या आधीच शिवसेना नेते भरत गोगावले यांचा कथित अघोरी विद्येचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरही त्यांनी टीका केली. पुरोगामी महाराष्ट्राचे ज्यांनी हे असे स्मशान आणि कब्रस्तान केले ते मिंधे लोक त्यांच्या रोजच्या जीवनातही मारण्या-मरण्याच्या गोष्टी करत असतील तर त्यात आश्चर्य वाटायला नको, असे ते म्हणतात. उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्राच्या बेइमानांना आव्हान दिले की, ‘‘तुम्ही शिवसेना संपवायचं स्वप्न पाहिलंत तरी ते पूर्ण होणे शक्य नाही. शिवसेना आणि ठाकरे ब्रॅण्ड या लोकांना संपवता येणार नाही. मी ठामपणे लढायला उभा आहे. हिंमत असेल तर माझ्यावर चाल करून या, पण येताना ऍम्ब्युलन्स घेऊन या.’’ ही आव्हानाची भाषा सर्वच महाराष्ट्रद्रोह्यांसाठी होती. हे एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक झोंबले, असे ते म्हणतात. यामुळेच मिंधे म्हणाले, ‘‘मेलेल्यांना मारून काय मिळणार? ते आधीच मेले आहेत.’’ एकनाथ मिंधे यांची ही मरण्या-मारण्याची भाषा म्हणजे त्यांच्या सध्याच्या मानसिक अवस्थेचे दर्शन असल्याचेही ते म्हणाले.



Source link

Comments are closed.