भारत-पाकिस्तानमध्ये नवा वाद पेटला, कर्णधार सलमान आगाने थेट अंपायरच्या निर्णयावर उचलले बोट, म्हण

फखर झमान संजू सॅमसन कॅच इंड. पाक एशिया कप 2025: आशिया कप 2025 च्या सुपर-4 सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यासाठी पाकिस्तानने संघात बरेच फेरबदल केले होते आणि त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे त्यांची नवी सलामी जोडी होती. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी डावाची सुरुवात केली. सुरुवात चांगली झाली, त्यामुळे पाकिस्तानचा हा डावपेच यशस्वी ठरणार असं वाटलं. पण तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याच्या चेंडूवर फखर जमान आऊट झाला आणि पाकिस्तानला पहिला धक्का बसला. सामना संपल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने फखर जमानच्या विकेटवर प्रतिक्रिया दिली.

अंपायरच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह

भारताविरुद्धचा सामना गमावल्यानंतर पत्रकार परिषदेत सलमान आगाला फखर जमानच्या विकेटबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावेळी त्याने सरळ अंपायरच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. पण त्याआधी मैदानावर नेमकं घडलं काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. खरंतर, तिसऱ्या षटकातील हार्दिक पांड्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर फखर जमानच्या बॅटचा कडा लागला आणि चेंडू थेट यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला. सॅमसनने कॅच धरला आणि अपील केलं. फील्ड अंपायरने तिसऱ्या अंपायरकडे निर्णय सोपवला. तिसऱ्या अंपायरने सर्व अँगलमधून रिप्ले पाहिलं आणि अखेर फखर जमानला आऊट दिलं. मात्र पाकिस्तानी फलंदाज या निर्णयावर नाराज दिसला.


सलमान आगा काय म्हणाला?

सामन्यानंतर सलमान आगा म्हणाला की, “माझ्या मते तो चेंडू आधी जमिनीला लागून मग सॅमसनच्या हातात गेला. अंपायरकडून चूक झाली असावी.” आशिया कप 2025 मध्ये ही दुसरी वेळ होती, जेव्हा पाकिस्तान संघाने पराभवानंतर अंपायरिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. सुपर-4 मध्ये थर्ड अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानने याआधी गट-सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर सरळ सामनाधिकाऱ्यालाच हटवण्याची मागणी केली होती. स्पष्ट आहे की ही पाकिस्तान क्रिकेटची जुनी सवय झाली आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झाले तर, रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या आशिया कप 2025 च्या सुपर फोर सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 चेंडू बाकी असताना 6 विकेट्सने पराभव केला. सध्या सुरू असलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर हा दुसरा विजय होता. भारताने 18.5 षटकांत 4 विकेट्स गमावून 174 धावा करून 172 धावांचे लक्ष्य गाठले. अभिषेक शर्मा आणि गिल यांनी भारतीय संघाला शानदार आणि वेगवान सुरुवात दिली.

या दोघांनी 9.5 षटकांत पहिल्या विकेटसाठी 105 धावा जोडल्या. 28 चेंडूंत 47 धावा काढल्यानंतर गिल बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव काही खास करू शकला नाही, तो 3 चेंडूंत खाते न काढता बाद झाला. अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक झळकावले, 39 चेंडूंत 5 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. अभिषेकच्या खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला. शेवटी तिलक वर्मा 30 धावांवर आणि हार्दिक 7 धावांवर नाबाद राहिले.

हे ही वाचा –

Fakhar Zaman Sanju Samson Catch Ind vs Pak Asia Cup 2025: फखर जमान OUT होता की Not Out?, संजू सॅमसनने कॅच पकडलेली की नाही?; व्हिडीओचा नवीन अँगल आला समोर

आणखी वाचा

Comments are closed.