Sandeep Deshpande alleges that Uddhav Thackeray is trying to take his own party forward


षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर सकारात्मक भाष्य केलं. मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीत तुमचे जर 60 आमदार आले असते तर तुम्ही इतके सकारात्मक असता का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

मुंबई : गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? याबाबत अनेक चर्चा सुरू आहे. अशातच गुरुवारी (19 जून) षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर सकारात्मक भाष्य केलं. मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीत तुमचे जर 60 आमदार आले असते तर तुम्ही इतके सकारात्मक असता का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. (Sandeep Deshpande alleges that Uddhav Thackeray is trying to take his own party forward)

जनतेच्या जे मनात तेच होणार, असे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा म्हटल्यासंदर्भात संदीप देशपांडे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, आम्हाला आता महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा हे जास्त महत्त्वाचे आहे. आमचा त्यादृष्टीने विचार सुरू आहे. परंतु काल जो उत्साह दिसला, तो 19 वर्षात कधीच का दिसला नाही? अचानक उत्साह का वाटायला लागला? अचानक बॅनर का लागायला लागले? संजय राऊत चार महिन्यांपूर्वी आम्हाला बोलले होते की, बाळासाहेबांचा फोटो का लावत आहात? असे असताना अचानक सगळेच सकारात्मक झाले, याला कारण काय? असे प्रश्न उपस्थित करत संदीप देशपांडे यांनी विधानसभा निवडणुकीतील ठाकरे गटाच्या कामगिरीवर भाष्य केलं.

हेही वाचा – Politics : अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी सर्व उदाहरणे; गोगावले प्रकरणी अंनिसचा फडणवीस-शिंदेवरही निशाणा

स्वत:चा पक्ष पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू

संदीप देशपांडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत त्यांचे 20 आमदार निवडून आले आहेत. जर त्यांचे 60 आमदार निवडून आले असते, तर शिवसैनिक इतके सकारात्मक दिसले असते का? 2017 साली आम्ही प्रस्ताव दिला, तेव्हा शिवसैनिक सकारात्मक नव्हते. त्यापूर्वी 2014 साली आम्ही प्रस्ताव दिला, त्यावेळेस त्यांचे शिवसैनिक सकारात्मक नव्हते. तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह का नव्हता? मी समजू शकतो की, तुमच्यावर वाईट वेळ आली आहे. तुम्ही विचार करताय की, स्वतःचा पक्ष आपण कसा पुढे न्यावा, त्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात काही गैर आहे, असे मला म्हणायचे नाही. पण, याचा अर्थ तुम्ही आमच्यावर दबाव आणू शकत नाही. त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय राज ठाकरे घेतली. पण त्यांनी आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा देतानाच संदीप देशपांडे म्हणाले की, शरद पवारांसोबत जाण्याबाबत कार्यकर्त्यांना विचारलं होतं का? काँग्रेस सोबत जाऊ का, यासाठी बैठका घेतल्या होत्या का? असे प्रश्न देखील विचारले आहेत.

हेही वाचा – Baramati : ठाकरेंनी पवारांचा उल्लेख ब्रॅंड म्हणून केला, पण सुप्रिया सुळे म्हणाल्या…



Source link

Comments are closed.