Sharad Pawar clear opinion on three-language formula, saying that Hindi language should not be forced


पहिलीपासून मुलांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करण्यात येऊ नये, या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाला आहे. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरून राज्यात खळबळ उडाली आहे. या धोरणानुसार केंद्र सरकारने राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू केले आहे. त्यामुळे त्या त्या राज्याच्या सरकारने विचार करून आपल्या राज्यात तीन कोणत्या भाषेचे शिक्षण लागू करायचे आहे, तो निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने राज्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांचे शिक्षण पहिलीपासून सक्तीचे केले आहे. पण मराठी आणि इंग्रजी व्यतिरक्त पहिलीपासूनच्या मुलांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती नको, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करण्यात येऊ नये, या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाला आहे. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. (Sharad Pawar clear opinion on three-language formula, saying that Hindi language should not be forced)

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. 20 जून) पुण्यातून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, हिंदी भाषा, राज्यातील पाऊस, पीडीसीसी बँक, एआय तंत्रज्ञान आणि विविध विषयांवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले. तेव्हा त्यांनी हिंदी भाषा सक्ती नको, पण ज्या विद्यार्थ्यांना ही भाषा शिकायची आहे, त्यांना ती शिकू द्यावी. कारण 55 ते 60 टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे संवाद करण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होतो, असे स्पष्ट मत शरद पवारांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा… Bawankule on Thackeray : जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

प्रसार माध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्रिभाषा सूत्राबाबत विचारणा केली. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, हिंदीची सक्ती नको. हिंदी भाषेचा द्वेष करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. विद्यार्थ्यांनी यासंबंधी निर्णय घ्यावा. पालक मार्गदर्शन करतील त्यानुसार ते निर्णय घेऊ शकतात. कोणी येत असेल, शिकायचे असेल तर नाही म्हणण्याचे कारण नाही. ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही, असे स्पष्ट मत शरद पवारांकडून व्यक्त करण्यात आले आहे. तसेच, देशातील 55 ते 60 टक्के लोक हिंदी बोलतात. सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेचा द्वेष करणे योग्य नाही. पण सक्ती करणे योग्य नाही, असे पवारांनी म्हटले.

एकत्रित निर्णय घेऊ…

यावेळी प्रसार माध्यमांनी शरद पवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुद्धा विचारणा केली. याबाबत ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार, आता तीन महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष आम्ही एकत्र बसू. निवडणुकीला एकत्र सामोरे जाता येईल का यावर चर्चा आणि विचार करू. त्यानंतर एकत्रित निर्णय घेऊ. मुंबईत आम्हा सगळ्यात उद्धव ठाकरेंची ताकद जास्त आहे. तिथे त्यांना विचारात घ्यावे लागेल, असेही यावेळी शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून काय निर्णय घेण्यात येणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Comments are closed.