Sharad Pawar mocked Devendra Fadnavis after he warned the opposition on the Shakti Peeth highway
देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गावूरन विरोधकांना इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याची आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे.
Sharad Pawar On Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला 20 हजार कोटींच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याची आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. (Sharad Pawar mocked Devendra Fadnavis after he warned the opposition on the Shakti Peeth highway)
शक्तिपीठ महामार्गाबाबत प्रश्न विचारला असता, शरद पवार म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. यासाठी मी कोल्हापूरच्या लोकांबरोबर मी बोलणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने आम्हाला शक्तिपीठ महामार्गाबाबत माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे. आता आमच कसं व्हायचं? असा प्रश्न उपस्थित करत शरद पवार यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे.
हेही वाचा – Sharad Pawar : हिंदी भाषेला साईडचं समजण्याचं कारण नाही; पवारांनी ठाकरे बंधुंच्या भूमिकेवरही मांडले मत
शक्तिपीठ महामार्गाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, हा प्रकल्प काय आहे? हे आधी मी समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का? ते समजून घेईन. त्यासाठी सरकारने आम्हाला माहिती दिली तर ती देखील मी घेणार आहे. ज्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत, त्या भागातले लोकप्रतिनिधी जे जाहीर बोलतायेत त्यांची मतं आणि त्यांचा आग्रह हा समजून घ्यावा लागेल. कारण मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी काय दिला होता इशारा?
शक्तिपीठ महामार्गाला काँग्रेस सर्वात जास्त विरोध करत असल्याचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले होते की, काँग्रेस पहिल्या दिवसापासून सर्वच विकासकामांना विरोध करत आहे. समृद्धी महामार्गाचा विरोध करणारी, हिच मंडळी होती. पण लोकांनी येऊन समृद्धी महामार्गाला समर्पण दिलं. मागच्या काळात कोल्हापूरच्या एअरपोर्टवर साडेतीनशे शेतकऱ्यांनी मला घेराव घातला आणि मला सह्यांचे पत्र देऊन सांगितलं की, आम्हाला शक्तिपीठ महामार्ग पाहिजे आहे. त्यांनी मला सांगितलं की, आम्ही खरे शेतकरी आहोत. तुम्ही आमच्या सह्या व्हेरिफाय करा, आमच्या नावावर शेती आहे की नाही, याची चौकशी करायला सांगितले. मी मान्य करतो की, काही लोकांचा विरोध असू शकतो. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी संवाद साधू. पण कालच उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, आम्हाला संवादाने ही गोष्ट करायची आहे. त्यामुळे आम्ही संवाद करू, पण राजकीय विरोध जे करतील, त्यांना मात्र आम्ही बघणार नाही, असा इशारा दिला होता.
हेही वाचा – Thackeray on Fadnavis : फडणवीस सरकारच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी…, ठाकरेंचा हल्लाबोल
Comments are closed.