वाघ गवत खात नाही, शरण जात नाही! संजय राऊत यांची जबरदस्त डरकाळी; मिंधे गटासह भाजपचा घेतला समाचार
हिंदुहृदयस्रमाट शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवानद करतो. या शिवसेनेचं रोपटं नव्हे त्यांनी झाडचं लावलं होतं. आणि त्या शिवसेनेला 59 वर्षे आज होताहेत. देशातल्या राजकारणातला हा एक चमत्कार आहे, असे म्हणत शिवसेना (उद्वव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांमध्ये उत्साह आणि जोश भरला.
आज कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही. फक्त विचार देण्याचा कार्यक्रम आहे. मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्याचं फार कारण दिसत नाही. कारण आपलं मनोरंजन करण्याची जबाबदारी या सरकारने घेतली आहे. रोज काहीतरी एक वेगळा कार्यक्रम ज्याला आपण शो म्हणतो… आज हॉरर शो झाला. थरारक सिनेमा, कोणीतरी एक मंत्री एका आघोरी बाबासमोर बसलेला आहे. उघडा बंब, टॉवेलवर… त्या आघोरी बाबाच्या हातात कवटी आहे आणि बहुतेक त्याच्या खुर्चीखाली रेड्याचं शिंग असावं. आणि बराच वेळ तो आघारी विद्येचा कार्यक्रम सुरू होता. आज सकाळी हॉरर सिनेमा पाहिला. या हॉरर सिनेमाचे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक त्यांचा सुद्धा आज एक कार्यक्रम कुठेतरी सुरू आहे हॉरर कार्यक्रम, डोममध्ये. या महाराष्ट्रात इतके मनोरंजनाचे कार्यक्रम होत आहे आता उद्धव ठाकरेसाहेबांनी ठरवलं की आपल्याला अशा कार्यक्रमाची गरज नाही. आपण थेट विचार देऊ या. 59 वर्षांच्या शिवसेनेला सातत्याने जर कोणता कार्यक्रम बाळासाहेबांनी दिला असेल तर तो या राज्याला आणि देशाला विचार देण्याचा, असे संजय राऊत म्हणाले.
विरोधी पक्षनेते अबंदास दानवे यांनी मराठवाड्यात त्यांनी शेकडो गावात, असंख्य तालुक्यात, गावपतळीवर आंदोलन केले. क्या हुआ तेरा वादा, क्या हुआ ओ कसम ओ इरादा… खरं म्हणजे या शिवसेनाचं नाव फार इन्ट्रेस्टिंग आहे शिवसैनिकांसाठी… जाताना त्यांनी तो मंत्र म्हणून घेऊन गेला पाहिजे. त्या सिनेमाचं नाव आहे ‘हम किसीसे कम नही’ इथे बसलेले शेकडो शिवसैनिक त्यांनी आपल्या मनाशी एक आत्मविश्वास, एक निर्धार आणि एक जिद्द पक्की ठेवली पाहिजे की ‘हम किसीसे कम नही’, ‘शिवसेना किसीसे कम नही’. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेची स्थापना केलेली आहे, असे संजय राऊत पुढे म्हणाले.
आज मुंबईत इकडे तिकडे होर्डिंग लागलेली आहेत. ज्यांचा जन्म दोन वर्षांपूर्वी झाला. त्यानाही वाटतं आपण 59 वर्षांचे झालो. आता या मुंबईमध्ये त्यांच्या पक्षाचा स्थापना सोहळा करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे, त्यांचा सोहळा सुरतला व्हायला पाहिजे. मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेची स्थापना शिवतीर्थावर झाली बाळासाहेब ठाकरे यांनी, उद्धवसाहेब ठाकरे यांची… तुमचा पक्ष स्थापन झाला गुजरातमध्ये आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कसा काय लावू शकता? तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा. तुम्ही अमित शहांचा फोटो लावा. वाटल्यास नरेंद्र मोदींचा लावा, आमची काही हरकत नाही. दोन वर्षापूर्वी तुमच्या गटाची स्थापना झाली आहे. तुमचा पुढचा कार्यक्रम… मी त्यांना विनंती करतो किंवा देवेंद्रजींना विनंती करतो, तुम्ही भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पुढल्या कार्यक्रमाची स्पॉन्सरशिप करावी. सरदार वल्लभाई पटेल स्टेडियममध्ये आता नरेंद्र मोदी स्टेडियम नाव केलं आहे आता. पण ते इथे कार्यक्रम करताहेत, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.
शिवसेना 59 वर्षांची झाली हा या देशातल्या राजकारणातला चमत्कारच आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा सांगितलं होतं या देशामध्ये फक्त दोनच सेना राहतील एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना. बाकी सगळ्या गुंडांच्या टोळ्या. 59 वर्षांची शिवसेना ही आजही विचाराने तरुण आहे. डोंगर कधी म्हातारा होत नाही आणि तुफानाचं वय मोजायचं नसतं. आणि वाघ कधी शरण जात नाही आणि वाघ कधी गवतही खात नाही. नाहीतर हे जे स्वतःला वाघ समजणारे लोक आहेत ते अमित शहांचं गवत खाताहेत, मोदींचं गवत खाताहेत. मी जेव्हा म्हणतो की शिवसेना या देशातल्या राजकारणातला हा सगळ्यात जुना पक्ष आहे. सगळ्यात जुना पक्ष, अनुभवी तर, हा बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आहे. जेव्हा शिवसेना या महाराष्ट्रात गर्जना करत होती, लढाया लढत होती, संघर्ष करत होती, मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी तेव्हा आजचे सगळे पक्ष हे पाळण्यामध्ये होते. भारतीय जनता पक्षाता जन्म 1980 मध्ये झाला. राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म 1976 मध्ये पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1999 साली जन्माला आला. बाकी सर्व पक्ष देशातले हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर जन्माला आले. आणि शिवसेना हा एकमेव पक्ष आहे आज असा की त्या पक्षानं 59 उन्हाळे पावसाळे वादळं तुफान अंगावर झेलले आहेत. आणि त्यातून आम्ही अत्यंत खंबीरपणे उभे आहोत, असा निशाणा संजय राऊत यांनी विरोधकांवर साधला.
आमच्या जीवनातला संघर्ष कधी संपला नाही. संघर्ष आमचा ऑक्सिजन आहे, संघर्ष आमचा प्राणवायू आहे. याचं कारण असं आहे, हा पक्ष भ्रष्टाचाराच्या आणि ठेकेदारांच्या पैशावर उभा राहिला नाही तर, शिवसैनिकांच्या रक्तावर घामावर आणि संघर्षावर उभा राहिलेला आहे. गेल्या चार वर्षांत काय कमी संकटं आली. पण असंख्य संकटं आली गेल्या ५९ वर्षांमध्ये. शिवसेनाप्रमुखांच्या डोळ्यासमोर त्यांनी घडवलेली माणसं सोडून गेली. माननीय उद्धवसाहेबांनी ज्यांना मोठी-मोठी पदं दिली ते सोडून गेले. माननीय बाळासाहेब असतील माननीय उद्धवजी असतील मी नेहमी सांगतो ठाकरेंनी माकडांची माणसं केली. त्या माणसांना सरदार सुद्धा आपणच बनवलं. आणि त्याच सरदाराने आमच्या पाठिमध्ये घाव घातला आहे. आणि इतक्या हल्ल्यानंतर सुद्धा ही शिवसेना कधी झुकली नाही, वाकली नाही. कुणाच्या चरणाशी बसली नाही. नाहीतर या भुतलावर असे अनेक नेते आहेत 56 इंच छातीवाले. एक ट्रम्पचा फोन येतो आणि सरेंडर होतात. आमच्यावर सुद्धा, माननीय उद्धवसाहेबांवर, आमच्या नेत्यांवर सुद्धा असे अनेक फोन, असे अनेक दबाव आमच्यावर आले पण आम्ही झुकलो नाही. सरेंडर होण्याचे काम नरेंदर और देवेंदर का है, हमारा नाही. हम लढने वाले लोग है, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
Comments are closed.