मोदी-शाह बोले.. भाऊ-भाई-दादा हले.. हिंदी सक्तीवरून अंबादास यांचा टोला

केंद्र सरकारने घेतलेले निर्णय कुठलाही विचार न करता राज्याच्या माथी मारले जात आहेत अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच मोदी-शाह बोले आणि भाऊ-भाई-दादा हले असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.

एक्सवर पोस्ट करून अंबादास दानवे म्हणाले की, अभिजात भाषेचे घर असलेल्या महाराष्ट्रात हिंदी सक्ती बद्दल मंत्र्यांमध्ये चर्चा तरी कशी होऊ शकते? मा.बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणारे मंत्री हिंदी सक्तीचे फतवे काढतात ही त्यांची वैचारिक दिवाळखोरीच आहे. खरं तर, राज्य सरकार केंद्राचे पोस्टमन झाले आहे. केंद्राचे निर्णय विनाविचार राज्याच्या माथी मारायचे एवढंच सध्या सुरू आहे. याचे चटके सरकारला जरूर बसतील असे दानवे म्हणाले. तसेच
मोदी-शाह बोले.. भाऊ-भाई-दादा हले.. असेही दानवे म्हणाले.

Comments are closed.