गंभीर अन् गिलचा धक्कादायक निर्णय? टीम इंडियाचं ‘ब्रह्मास्त्र’च वापरणार नाही, पहिल्या कसोटीतून ब

जसप्रिट बुमराह इंडस्ट वि इंजी 1 ची चाचणी: भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेची सुरुवात 20 जूनपासून होत असून, त्याचा उत्साह सर्व खेळप्रेमींमध्ये जोमाने जाणवतोय. या मालिकेत टीम इंडियाला केवळ इंग्लंडवर विजय मिळवायचा नाही, कारण 2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा ठसा उमटवायचा. यावेळी टीम इंडियाचे नेतृत्व युवा आणि धडाकेबाज शुभमन गिल करत आहे. यादरम्यान, माजी ऑस्ट्रेलियन स्पिनरने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल धक्कादायक विधान केले आहे. त्याने कर्णधार शुभमन गिलला पहिल्या कसोटीत बुमराहला न खेळवण्याचा सल्ला दिला आहे, जे ऐकून चाहते हैराण झाले आहेत.

गंभीर अन् गिल टीम इंडियाचं ‘ब्रह्मास्त्र’च वापरणार नाही?

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉगने 20 जूनपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला न खेळवण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणतो की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जखमी झालेला जसप्रीत बुमराह अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याला पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात यावी. आणि दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याला खेळवण्यात यावे, जेणेकरून तो अजून तरोताजा आणि अधिक प्रभावी ठरेल.

एका मुलाखतीदरम्यान ब्रॅड हॉग म्हणाला, “बुमराला लॉर्ड्सवर होणाऱ्या सामन्यासाठी राखून ठेवले पाहिजे, जिथे चेंडू जास्त हलतो आणि जिथे तो एका स्पेलमध्ये सामन्याची दिशा बदलू शकतो”.

बुमराह हा खरा ‘मॅच विनर’…

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू म्हणाला की, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा मॅच विनर खेळाडू आहे. म्हणून जिथे त्याची सर्वात जास्त गरज आहे तिथे त्याचा वापर करा. त्याच्याकडून तुम्हाला सर्वात जास्त फायदा कुठे मिळेल? कारण तो सामन्याचा दिशा बदलू शकतो. तो मालिका पूर्णपणे बदलू शकतो. म्हणूनच त्याला निश्चितपणे लॉर्ड्सवर खेळवले पाहिजे. त्यामुळे जर मी तिथे असतो तर मी पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहला खेळवले नसते. टीम इंडिया 10 जुलै रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळणार आहे.

जसप्रीत बुमराह म्हणजे भारताचा ‘ब्रह्मास्त्र’ आहे, ज्याच्या एका स्पेलमध्ये सामना फिरू शकतो. त्यामुळे गंभीर आणि गिल यांच्यासाठी हा मोठा निर्णय असेल. बुमराह खेळतो की विश्रांती घेतो?  आता सर्वांच्या नजरा पहिल्या कसोटीसाठी जाहीर होणाऱ्या अंतिम संघाकडे आहेत.

बुमराहची इंग्लंडमधील कामगिरी

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध 9 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 26.27 च्या सरासरीने 37 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने दोनदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाला बुमराहकडून पुन्हा एकदा अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. यासाठी त्याच्यासाठी तंदुरुस्त राहणे सर्वात महत्त्वाचे आहे.

हे ही वाचा –

जैस्प्रिट ब्राम्रा न्यूज: बुमरहानने स्वत: व्यवसायाचा मोठा आवाज नाकारला आहे? कारण तो तुम्हाला धक्का बसला.

आणखी वाचा

Comments are closed.