स्टॉम्चाल्हाखालही: पावसात, पावसात पोट आहे का?
पावसाळ्यात पोट बिघडण्याचे मुख्य कारण म्हणजे आर्द्रता आणि अस्वच्छता. ज्यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात. याशिवाय पावसाळ्यात उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थात बॅक्टेरिया जास्त प्रमाणात वाढतात. परिणामी , खराब झालेले अन्न खाल्ल्याने पोटाचे आरोग्य बिघडते. याव्यतिरिक्त दुसरं कारण म्हणजे पावसाळ्यात हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे आणि दुषित पाण्यामुळे पचनसंस्था कमजोर होते, त्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता अधिक वाढते. खरं तर,
पावसाळ्यात पोट वारंवार खराब होणं ही सामान्य गोष्ट आहे. पण, तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतल्यास नक्कीच ते टाळता येऊ शकते. आज आपण जाणून घेऊयात पावसाळ्यात वारंवार पोट खराब होण्याची कारणे आणि उपाय,
पोट खराब होण्याची कारणे –
दमट हवामान –
पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता पचनक्रिया संथ गतीने करते. ज्यामुळे अन्न पचनास वेळ लागतो. अन्न पचनास वेळ लागल्याने ऍसिडिटी, गऍस, पोटदुखी यासारख्या समय्या उद्भवू शकतात.
दूषित पाणी आणि अन्न –
पावसाळ्यात पाणी आणि अन्न लवकर दुषित होण्याची शक्यता असते, त्यामुळे विषाणूजन्य संसर्गाचा धोका वाढतो.
उघड्यावरील पदार्थांचे सेवन –
पावसाळ्यात गरमा-गरम पदार्थ खाण्याची इच्छा जास्त प्रमाणात होते, त्यामुळे असे तेलकट, तळलेले उघड्यावरील पदार्थ आपण खातो. पण, असे उघड्यावरील पदार्थ पोटासाठी हानिकारक ठरू शकतात.
यावरील उपाय –
स्वच्छ पाणी प्या –
पावसाळ्यात पिण्याचे पाणी स्वच्छ आहे का नाही, याकडे लक्ष द्यावे.
उघड्यावरील पदार्थ खाणे टाळा –
बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळा आणि घरी बनवलेले खा.
पुरेसे पाणी प्या –
दिवसातून पुरेसे प्या. पाण्यामुळे संपूर्ण आरोग्य निरोगी राहते.
नियमित व्यायाम –
नियमित योगा केल्याने पचनक्रिया सुधारते.
पुरेशी विश्रांती घ्या –
रात्रीची चांगली झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते.
हेही पाहा –
Comments are closed.