Sushma Andhare alleges that local representatives are responsible for the collapse of the bridge on the Indrayani river
आज (15 जून) दुपारच्या सुमारास पुण्याच्या तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध असलेल्या कुंडमळा या पर्यटनस्थळावरीवल इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. मात्र या पूल दुर्घटनेनंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले आहेत.
पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पर्यटक डोंगर आणि नदीच्या किनाऱ्यावर जाऊन आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. मात्र आज (15 जून) दुपारच्या सुमारास पुण्याच्या तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध असलेल्या कुंडमळा या पर्यटनस्थळावरीवल इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 30 हून अधिक पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूल दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र आता पूल दुर्घटनेनंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले आहेत. (Sushma Andhare alleges that local representatives are responsible for the collapse of the bridge on the Indrayani river)
पूल दुर्घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी म्हटले की, इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र ही घटना का घडली? याचा शोध घेतला असता, कुंडमळा परिसरातील इंद्रायणीवरचा पूल किंवा एकूणच राज्यातील वेगवेगळ्या नद्यांवर असणारे पूल यांच्या संबंधाने आवश्यक असणारी कामे पावसाळ्याआधी होणे अधिक गरजेचे आहे. अशा मोडकळीस आलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणे गरजेचे आहे. मात्र या पुलाच्या बाबतीत अशी कुठलीही खबरदारी घेतलेली नव्हती. वारंवार ग्रामस्थांनी नवीन पुलाची मागणी केलेली असताना आणि पर्यायी रस्ता उपलब्ध नसताना सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधीनी या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे या दुर्घटनेत गेलेले बळी हे नैसर्गिक बळी नाहीत तर शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बळी आहेत, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
हेही वाचा – Ajit Pawar : पुण्यातील दुर्घटना दुर्दैवी, अफवांवर विश्वास ठेवू नका; अजित पवारांचे आवाहन
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करताना म्हटले की, पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले आहे. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे म्हणत फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. या दुर्घटनेत 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
हेही वाचा – Politics : काही लोकांनी रुमाल वेटरसारखा खांद्यावर टाकला; भरत गोगावलेंनी तटकरेंची उडवली खिल्ली
Comments are closed.