Sushma Andhare’s suggestive statement on the talk of Raj Thackeray and Uddhav Thackeray coming together


संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्यातील शा‍ब्दिक वादामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करत शिवसैनिकांना आवाहन केले आहे.

Sushma Andhare On Shiv Sena MNS Together : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे. दोन्ही बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महत्त्वाचे म्हणजे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन सुरू झाले आहे. मात्र मनसेचे मुंबई विभाग अध्यक्ष संदीप देशपांडे हे सातत्याने उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक वक्तव्य करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत संदीप देशपांडे यांना प्रत्युत्तर देत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. (Sushma Andhare’s suggestive statement on the talk of Raj Thackeray and Uddhav Thackeray coming together)

संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्यातील शा‍ब्दिक वादामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करत शिवसैनिकांना आवाहन केले आहे. सुषमा अंधारे यांनी म्हटले की, सेना-मनसे युती होण्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, तरी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितापुढे सगळ्या प्रकारच्या टीकाटिप्पणी शुल्लक आहेत. त्यामुळे सर्व शिवसैनिकांना आवाहन आहे की, आपण संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत. मराठी माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जबाबदारीचे भान ठेवून शिवसैनिकांनी व्यक्त व्हावे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी आदेशावरून असा उल्लेखही आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

हेही वाचा – Nitesh Rane : …त्यावर आझमीसारखं कार्ट काहीच बोलत नाही; एकेरी उल्लेख करत राणेंची सडकून टीका

संदीप देशपांडे यांची आजही ठाकरे गटावर टीका

संदीप देशपांडे यांनी आज सकाळी ट्वीट करताना म्हटले की, होय आम्ही नवीन आहोत, पण कधी ‘केम छो वरळी’ म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत. ‘जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा’, असं देखील म्हणालो नाही. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी 20 हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाहीत. आम्हाला अभिमान आहे की, आम्ही नवीन आहोत. तुम्ही जुने असून काय उपटलं, अशी सडकून टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

हेही वाचा – Language Controversy : हिंदीचा मुद्दा पेटला, आमदारांबाबत मनसे नेत्याचे वादग्रस्त विधान





Source link

Comments are closed.