आशिया कपची खरी ट्रॉफी कुणाकडे आहे? सूर्यकुमार यादवचे उत्तर ऐकून चकित व्हाल!

आशिया कप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. अंतिम सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने दिलेल्या निवेदनात मूळ आशिया कप ट्रॉफी कोणाकडे आहे हे उघड झाले. सामन्यानंतरच्या सादरीकरणानंतर, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्लेअर ऑफ द टूर्नामेंट अभिषेक शर्मासह पत्रकार परिषदेत भाग घेतला, जिथे त्याने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने ट्रॉफी न स्वीकारण्याबद्दल सांगितले की, “मी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून, मी कधीही कोणत्याही चॅम्पियन संघाला ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देताना पाहिले नाही. आमच्यासाठी असे करणे खूप कठीण होते, ते सोपे नव्हते. आम्ही सलग दोन चांगले सामने जिंकले आणि आम्ही या ट्रॉफीला पात्र आहोत. मला वाटत नाही की मला जास्त काही सांगण्याची गरज आहे, कारण आम्ही स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे संपवली.”

सूर्यकुमार यादवने आशिया कप ट्रॉफीबद्दल सांगितले की माझ्यासाठी ट्रॉफी माझ्या ड्रेसिंग रूममध्ये आहे. माझ्या संघातील सर्व 14 खेळाडू, सपोर्ट स्टाफ, हे माझ्यासाठी खरे ट्रॉफी आहेत, जे माझ्याकडे आहे. माझ्यासाठी खरे ट्रॉफी ते लोक आहेत ज्यांनी आशिया कपच्या सुरुवातीपासून आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही येथून चांगल्या आठवणी घेऊन जात आहोत, ज्या माझ्यासोबत कायम राहतील.

पुढे तो म्हणाला की, पाहा जिंकल्यानंतर मोठ्या पडद्यावर लिहिले आहे, ‘भारत, 2025 आशिया कप चॅम्पियन आणि तुम्ही फक्त यासाठी खेळता’ आणि मला वाटते की सर्व खेळाडू याच्याशी सहमत असतील. अभिषेक शर्माने सूर्यकुमारच्या या विधानाला होकार दिला, मग सूर्य म्हणाला की बघा, त्यानेही हो म्हटले आहे.

Comments are closed.