Thackeray criticizes Ajit Pawar over Indrayani bridge accident


मुंबई लोकलमधून पडून झालेला पाच प्रवाशांचा मृत्यू, त्याचे दुःख आणि धक्का राज्याला अस्वस्थ करीत आहे. रेल्वे, नद्या, रस्ते, हवाई वाहतूक सगळेच या राज्यात असुरक्षित बनले आहे.

(Thackeray on Mahayuti) मुंबई : पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला. या पूल दुर्घटनेत लोकांचे प्राण घेणाऱ्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि ज्या मावळात ही भयंकर दुर्घटना घडली तेथील आमदार सुनील शेळके हे अजित पवार यांचे खास हस्तक आहेत. आमदारांना त्यांच्या गावातला जीर्ण पूल दिसला नाही, पण स्वतः निवडून येण्यासाठी त्यांनी शंभरावर कोटी रुपये खर्च केले. अजित पवार पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाकडे लक्ष देतात म्हणजे नक्की काय करतात? बिल्डरांचा, जमीनदारांचा विकास होतो, पण इंद्रायणी नदीवरील जीर्ण पूल कोसळून माणसे वाहून जातात. ही गरीबांची कामे विकासाच्या व्याख्येत बसत नाहीत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Thackeray criticizes Ajit Pawar over Indrayani bridge accident)

महाराष्ट्राला दुर्घटना आणि अपघातांचे तडाखे बसत आहेत. अहमदाबादच्या विमान अपघातात महाराष्ट्रातल्या 17 जणांचा मृत्यू झाला. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून अकोल्याचे कुटुंब ठार झाले. गोदावरी नदीत पाच युवकांचा बुडून मृत्यू झाला. माथेरानच्या शार्लोट तलावात तीन पर्यटक बुडाले. चारही बाजूंनी फक्त दुःखद, निराश करणाऱ्या वार्ताच कानावर येत आहेत. त्याच वेळी मालवणच्या राजकोटवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याखालच्या जमिनीस तडे गेल्याची बातमी चिंताजनक आहे. आधी तेथील पहिला भव्य पुतळा कोसळला आणि आता नव्या पुतळ्याखालची जमीन खचली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे हे अपयश आहे, असेही त्यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – Pune Bridge Collapsed : मुख्यमंत्र्यांचे दुःख, चिंता, चौकशीचे आदेश म्हणजे ढोंग; ठाकरेंचे टीकास्त्र

इकडे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आणि तिकडे शिवरायांच्या पुतळ्याखालचे बांधकाम बिघडले. मग यावर खर्च झालेले कोट्यवधी रुपये नक्की गेले कोठे? याची चौकशी करणार नसाल तर तुमच्या तपास आणि चौकशांच्या घोषणा व्यर्थ आहेत. मुंबई लोकलमधून पडून झालेला पाच प्रवाशांचा मृत्यू, त्याचे दुःख आणि धक्का राज्याला अस्वस्थ करीत आहे. रेल्वे, नद्या, रस्ते, हवाई वाहतूक सगळेच या राज्यात असुरक्षित बनले असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात केली आहे.

महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचीही तीच तऱ्हा म्हणायला हवी. नको त्या कामांसाठी उधळपट्टी करणारे सरकार इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम करत नाही आणि एका क्षणात तो पूल कोसळून माणसे जिवंत वाहून जातात. त्यावर मुख्यमंत्री शोक व्यक्त करतात आणि त्यांचे खजिनदार मृतांना पाच लाखांची मदत घोषित करतात. महाराष्ट्रावर निर्दय मनाची माणसे राज्य करीत आहेत, असेच म्हणावे लागेल, असे त्यांनी नमूद केले आहे.

मोदींवर शरसंधान

अहमदाबाद विमान अपघातानंतर देशावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दुःखाची पर्वा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस वगैरे देशांच्या दौऱ्यावर गेले. विमान अपघातातील मृतांच्या चिता विझलेल्या नाहीत. कुटुंबीयांचे अश्रू थांबलेले नाहीत. पंतप्रधान अहमदाबादेत आले आणि निघून गेले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : शिंदेंची शिवसेना पक्ष नाही तर गट, अमित शहांवर निशाणा साधत राऊतांचे टीकास्त्र



Source link

Comments are closed.