Thackeray on Farmers Loan : Thackeray strongly criticizes Fadnavis
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार? फडणवीस यांचे राज्य अवतरल्यापासून राज्यात पाच हजारांवर शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्येचा आकडा पूर्ण एक लाख झाल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे काय?
(Thackeray on Farmers Loan) मुंबई : मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी दिल्लीत नरेंदरभाई (पंतप्रधान नरेंद्र मोदी) आणि महाराष्ट्रात देवेंदरभाऊ (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) शर्थीचे प्रयत्न करीत असतात. त्यामुळे त्यांना पदोपदी खोटे बोलावे लागते. निवडणुकीपूर्वी दिलेल्या सर्व आश्वासनांना हरताळ फासून फडणवीस आणि त्यांचे लोक सत्तेवर बसले आहेत. ‘राज्य’ आल्यावर लगेच कर्जमाफी करू असे वचन फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्न पत्रकारांनी योगधारणा संपल्यावर फडणवीस यांना केला तेव्हा प्राणायामाचा दीर्घ श्वास घेऊन फडणवीस म्हणाले, ‘‘योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेणार. एकही शब्द सरकार फिरवणार नाही.’’ फडणवीस यांचे हे विधान म्हणजे बोलबच्चनगिरीचा कळस आहे, अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Thackeray strongly criticizes Fadnavis)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार? फडणवीस यांचे राज्य अवतरल्यापासून राज्यात पाच हजारांवर शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्येचा आकडा पूर्ण एक लाख झाल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे काय? असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केला आहे.
हेही वाचा – Politics : शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव राऊतांनी शिंदेंपुढे मांडला होता; ज्येष्ठ नेत्याचा खळबळजनक दावा
फडणवीस यांचे सरकारी खजिनदार अजित पवार ठामपणे सांगतात, ‘‘कर्जमाफीचे नावच काढू नका. मी काही कर्जमाफीचे आश्वासन कधी दिले नव्हते. सगळी सोंगे करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही.’’ शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी फेडावेत अशा सूचनाही दिल्या. फडणवीस मात्र योग्यवेळी आम्ही पैशाचेही सोंग आणू आणि कर्जमाफी करू, असे सांगत आहेत. कदाचित ही योग्य वेळ राजकीय सोय पाहून येईल. पुढील लोकसभा-विधानसभा निवडणुकांआधी साधारण दोन महिने शेतकऱ्यांना लाडक्या बहिणींप्रमाणे जाळ्यात ओढले जाईल हे नक्की, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
https://www.youtube.com/watch?v=i5gnW0X3lZk
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा वादा सत्तेतील लाडक्या भावांनी केला होता, पण लाडक्या बहिणींची भरघोस मते मिळाल्यावर 2100 सोडा, पण मूळचे 1500 देतानाही मारामार झाली आहे. आता हे 2100 देण्याचा मुहूर्तही निवडणुकांच्या आधीच काढला जाईल, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा – Devendra Fadnavis : अबू आझमींचं वारीसंदर्भात वादग्रस्त विधान; फालतू वक्तव्य म्हणत फडणवीसांची टीका
Comments are closed.