Thackeray targets BJP over Ram Darbar


(Thackeray Vs BJP) मुंबई : अयोध्येत 22 जानेवारी 2024च्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता राम दरबाराचे सगळ्यात मोठे आयोजन झाले. राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा अभिजित मुहूर्तावर करण्यात आली. राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी गंगा दशहराच्या दिनी 17 मिनिटांचा खास अभिजित मुहूर्त निवडला. याचे कारण म्हणजे अशी मान्यता आहे की, भगवान श्रीरामांचा जन्म अभिजित मुहूर्तावरच झाला. त्यामुळे राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा त्याच मुहूर्तावर करण्यात आली. हे झाले राम दरबाराचे धार्मिक आणि वैदिक विश्लेषण. पण अयोध्येत जो राम दरबार सजला आहे, त्यास दरबार म्हणणे हिंदू धर्म आणि संस्कृतीनुसार योग्य आहे काय? असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (Thackeray targets BJP over Ram Darbar)

‘दरबार’ हे मोगल राजा, बादशहांचे भरत असत. प्रभू श्रीराम त्याआधीचे अवतार पुरुष आहेत. मोगलांचा दरबार हा पाच-सहाशे वर्षांपूर्वीचा. त्यामुळे भगवान श्रीराम दरबार नाही. ती फार तर ‘रामसभा’, ‘राम बैठक’ असू शकेल. रामसभेत सगळेच श्रीरामांचे कुटुंब विराजमान आहे आणि ते आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – BMC : मुंबई महापालिकेत बदल्यांचा बाजार; इंजिनिअर्सच्या बढत्या आणि बदल्यांसाठी होतेय लाखोंची बोली

राम दरबार उत्तम रीत्या वैभवाने सजला आहे. राम दरबारासाठी हिरे, सोने, चांदीचे दागिने सुरतचे रामभक्त व्यापारी मुकेश पटेल यांनी दान केले. या दागिन्यांत काय आहे? एक हजार कॅरेटचा हिरा, 30 किलोची चांदी, 300 ग्रॅम सोने, 300 कॅरेट माणकांपासून बनवलेले 11 मुकुट आहेत. शिवाय प्रभू श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्यासाठी हार, कर्णफुले, कपाळावर सुवर्णतिलक, धनुष्य आणि बाण आहेत. हा भव्य राम दरबार त्यामुळे देखणा, तेजस्वी आणि वैभवशाली बनला आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

तथापि, दरबारात राजकारण, व्यवहार, न्यायनिवाडा होतो. रामसभेला पावित्र्य आहे. ते अयोध्या नगरीत टिकवायला हवे. रामराज्य आणि रामसभा यांची सांगड घालायला हवी. देशात रामराज्य उरलेले नाही. श्रीराम हे सत्यवचनी, एकवचनी होते. ते सत्य आजच्या राजवटीत रोज पराभूत होताना दिसते. ते पाहून श्रीरामही रामसभेत अस्वस्थ होत आहेत. असत्य मार्गाचा अवलंब करून जे लोक भारताच्या सत्तेवर विराजमान झाले, त्यांना रामसभेचे महत्त्व आणि पावित्र्य कधीच समजणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Ram Mandir : …म्हणून मोदी अयोध्येत पुन्हा फिरकलेच नाहीत, ठाकरेंची बोचरी टीका



Source link

Comments are closed.