BCCI ला हायकोर्टाने दिला मोठा झटका! 'या' माजी IPL टीमला मिळणार 538 कोटी! जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

बीसीसीआय: आयपीएलमध्ये (IPL) एकेकाळी कोची टस्कर्स केरळ (Kochi Tuskers Kerala) नावाचा एक संघ खेळत होता. पण वादांमुळे ही फ्रँचायझी अचानक गायब झाली. आता या संघाचे नाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. बीसीसीआयला (BCCI) कोची टस्कर्स केरळशी संबंधित एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची याचिका फेटाळून लावत फ्रँचायझीला 538 कोटी रुपये देण्याचा मोठा आदेश दिला आहे. (Kochi Tuskers Kerala IPL)

कोची टस्कर्स केरळने आयपीएल 2011 मध्ये सहभाग घेतला होता. पण, पुढील हंगामात ही फ्रँचायझी दिसली नाही, कारण बीसीसीआयने या संघाचा करार रद्द केला होता. बीसीसीआयचे म्हणणे होते की, फ्रँचायझीने बँकेची हमी (बँक गॅरंटी) भरली नव्हती. या निर्णयाविरोधात फ्रँचायझीचे मालक रेंडेझवस स्पोर्ट्स वर्ल्ड (Rendezvous Sports World) आणि कोची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड (Kochi Cricket Private Limited) लवादाकडे (ट्रिब्युनल) गेले. फ्रँचायझीने यावर आपली बाजू मांडताना सांगितले होते की, स्टेडियमची उपलब्धता आणि भागधारकांच्या मंजुरीमुळे ते बँकेला हमी रक्कम देऊ शकले नाहीत, परंतु बीसीसीआयने घाईघाईने संघाचा करार रद्द करणे अजिबात योग्य नव्हते. (BCCI vs Kochi Tuskers)

जानेवारी 2012 मध्ये कोची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडने बीसीसीआयला पत्र लिहून कळवले की ते लवादात जातील. लवादाने बीसीसीआयच्या सर्व युक्तिवादांना फेटाळून लावले आणि बोर्डाने संघाचा करार चुकीच्या पद्धतीने रद्द केला हे मान्य केले. (BCCI Contract Termination) यासोबतच, बीसीसीआयला 18 टक्के व्याज लावून संघाच्या मालकांना 538 कोटी रुपये चुकवावे लागतील. पण, बीसीसीआयकडे अजूनही या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाण्याचा पर्याय खुला आहे. अंतिम निर्णय मात्र बोर्डालाच घ्यायचा आहे. कोची टस्कर्स केरळने आयपीएल 2011 मध्ये खेळलेल्या अनेक खेळाडूंना आजपर्यंत पूर्ण पैसे दिलेले नाहीत.

Comments are closed.